येथे दिले जातात आदर्श समाजनिर्मितीचे धडे
By Admin | Updated: May 28, 2015 01:15 IST2015-05-28T01:15:25+5:302015-05-28T01:15:25+5:30
बाल संस्कार शिबिराची सांगता$$्रिंअर्जुनी मोरगाव : हे धावपळीचे युग आहे. कुणालाही कुणाशी मनसोक्त संवाद करण्याची सवय नाही.

येथे दिले जातात आदर्श समाजनिर्मितीचे धडे
बोरी येथील उपक्रम : बाल संस्कार शिबिराची सांगता$$्रिंअर्जुनी मोरगाव : हे धावपळीचे युग आहे. कुणालाही कुणाशी मनसोक्त संवाद करण्याची सवय नाही. माणूस माणसापासून दूर होत आहे. या वैज्ञानिक युगात टी.व्ही. मोबाईल व व्यसनाने आजच्या युवा-पिढीवर आक्रमण केले आहे. या सर्व बाबी युवापिढीच्या ‘फॅशन्स’ झाल्या आहेत. आजच्या युवापिढीला यापासून परावृत्त करता येईल काय? या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले बोरी येथील गावकरी गेल्या पाच वर्षांपासून बाल संस्कार शिबिराचे आयोजन करतात. रविवारला (दि.२४) बारा दिवसीय या शिबिराची सांगता झाली.
अगदी ८०० लोकसंख्या असलेले बोरी (महागाव) हे गाव. मात्र या गावावर राष्ट्रसंताचा पगडा पडला आहे. राष्ट्रसंतांचे विचार या गावात रुजले आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानार्जनाचे शिक्षण उरले आहे. राष्ट्रसंताची शिकवण, संस्कार, नीतिमूल्यांची जपणूक या सर्वांचा ऱ्हास होत आहे. पेराल तसं उगवेल अशी एक म्हण प्रचलित आहे. आज या युवापिढीमध्ये काही तरी चांगली संस्कारमूल्ये पेरण्याची गरज आहे. आज पेरले तर उद्या निश्चितपणे ही भावी पिढी यशस्वी वाटचाल करु शकेल. आई-वडील, देश, नीती, संस्कार, अस्मिता व मातृभूमीवर प्रेम करायला शिका. हीच आपली संस्कृती आहे. परंतु हल्ली अतिफॅशनबाजीमुळे अंगप्रदर्शन वाढले आहे. टीव्ही, मोबाईलचा संचार या बालमनावर अतिक्रमण करीत आहे. ही आपली संस्कृती नाही.
पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाकडे युवापिढी आकर्षित होत आहे. युवापिढीच्या या वाटचालीमुळे संस्कृतीच जखमी व्हायला लागली आहे. या सर्व घटकांवर मात करण्यासाठी बालसंस्कार शिबिराची गरज आहे. या उदान्त हेतूने झपाटलेल्या बोरी येथील दुर्योधन मैंद, हिरालाल घोरमोडे, भूमेंद्र चव्हाण यांनी गावकऱ्यांच्या पुढाकाराने बालसंस्काराची चळवळ गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यास सुरुवात केली. आजही ही ज्योत तेवत आहे. ही ज्योत मशाल म्हणून इतर गावातही तेवत ठेवावी, असे आवाहन त्यांनी या बाल संस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमातून केले आहे. या शिबिरात अर्जुनी-मोरगाव, साकोली, सडक-अर्जुनी, ब्रह्मपुरी व लाखांदूर तालुक्यातील १४ ते १८ वयोगटातील ५० शिबिरार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरी व बोरीवासीयांतर्फे दरवर्षी मुले व मुलींकरिता हे मोफत शिबिर घेतले जाते. या शिबिरात हिंदू, बौद्ध व मुस्लीम अशा सर्व प्रवर्गातील मुले-मुली सहभागी होतात.
या शिबिरात शारीरिक, बौद्धीक, संगीत, व्यक्तिमत्त्व विकास, लाठी-काठी, मलखांब, आचरण, संस्कार या सर्वंकष शिक्षणाचा अंतर्भाव असतो. पहाटे ४ वाजतापासून तर रात्री १० वाजतापर्यंत हे शिबिर अत्यंत शिस्तीत चालते. या शिबिरात गुरुकुंज मोझरी येथील गणेश बोथडे, अक्षय देशमुख, राम वनस्कर व रवी गायकवाड या चार प्रशिक्षकांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले. समारोपीय कार्यक्रमात प्रशांत ठाकरे या युवकाने आपल्या मधुरवाणीतून प्रशिक्षणार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. हे शिबिर आचार्य हरीभाऊ वेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. या पाच वर्षांत ४०० युवकांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रधर्म युवा मंचचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक नागपूर, सदाशिव पुरोहित, एन.आर.एच.एम.चे उपविभागीय अभियंता सुनील तरोणे, ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरीचे डॉ. प्रशांत झोडे, कोरंभीटोलाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. झोडे, भूते, लाखांदूर पं.स.चे माजी उपसभापती रामचंद्र राऊत, माजी पं.स. सभापती वर्षा घोरमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी )