शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पावसामुळे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील पाच मार्ग बंद आहेत. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात एकूण २७८.६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देपुजारीटोला, कालीसराड धरणाचे दरवाजे उघडले : सहा मार्ग बंद, नदी नाले तुडूंब, नदीकाठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शनिवारी (दि.७)रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने आमगाव,सालेकसा आणि गोंदिया तालुक्यात जोरदार हजेरी लावली.या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले. इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पावसामुळे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील पाच मार्ग बंद आहेत. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात एकूण २७८.६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत होते.गेल्या चौवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद ही आमगाव तालुक्यात १२२ मि.मी.झाली असून त्या पाठोपाठ सालेकसा ९२.८६, गोंदिया ७८.५७ मि.मी.पाऊस झाला.तर रावणवाडी १०५, खमारी ८९, कामठा १३६, आमगाव १५०, तिगाव ७६.६०, ठाणा १२३, कट्टीपार १४२, सालेकसा १०८, कावराबांध ९८, साकरीटोला महसूल मंडळात ७२.४० मि.मी.पावसाची नोंद झाली. गोंदिया, आमगाव,सालेकसा या तीन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.मुसळधार पावसामुळे आमगाव शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे किडंगीपार-शिवणी,किंडगीपार-जवरी,बोथली-ठाणा, भजेपार-अंजोरा, चिचटोला-धानोली, घाटटेमणी-कामठा या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पावसामुळे या तिन्ही तालुक्यात घरांची सुध्दा पडझड झाली असून महसूल विभागाने सर्वेक्षणास सुरूवात केली आहे.रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले.तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण ओव्हर फ्लो झाले असून या धरणातून १ फूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.लगतच्या मध्यप्रदेशात सुध्दा मुसळधार पाऊस सुरू असल्याने संजय सरोवर धरणाचे ६ दरवाजे ६ फुटाने उघडण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. पावसामुळे रोवणी केलेल्या धान पिकाला संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पावसाने गाठली सरासरीयंदा जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली होती.मात्र आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पावसाची तूट भरुन निघाली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो.त्या तुलनेत आत्तापर्यंत १३५० मि.मी.पावसाची नोंद झाली असून पावसाने सरासरी गाठली आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत ९२ टक्के पावसाची नोंद झाली असून पाणी टंचाईचे संकट सुध्दा टळले आहे.सिंचन प्रकल्प ७० टक्क्यांवरमागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे.मागील सहा वर्षांत यंदा प्रथमच इटियाडोह प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पात ७० टक्केच्यावर पाणीसाठा आहे.वस्त्यांमध्ये साचले पाणीशनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी सकाळपर्यंत कायम होता.त्यामुळे गोंदिया आणि आमगाव शहरातील काही वस्त्यांमध्ये पाणी साचले होते.त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. पावसामुळे काही प्रमाणात घरांची सुध्दा पडझड झाली आहे.पावसामुळे सहा मार्ग बंदपावसामुळे किडंगीपार-शिवणी, किंडगीपार-जवरी, बोथली-ठाणा,भजेपार-अंजोरा,चिचटोला-धानोली, घाटटेमणी-कामठा या मार्गावरील पुलावर पाणी वाहत असल्याने या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.केशोरी,महागाव येथे सर्वाधिक पावसाची नोंदजिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी आणि महागाव या दोन महसूल मंडळात झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी