शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

साडेचार हजार हेक्टरला गारपीट, वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:17 PM

जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्दे३५१ गावे बाधित : १० हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासन मदतीसाठी नेमके कोणते निकष लावून मदत जाहीर करते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मागील खरीप हंगामात कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळायचीच असताना आता रब्बी पिकांना गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि आशेवर पूर्णत: पाणी फेरल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे सुरूवातीला कृषी विभागाने ४०० हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे केल्यानंतर तब्बल ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आले आहे. यात गहू, हरभरा, लाखोळी, भाजीपाला, धान या पिकांचे व आंबा, केळी, अ‍ॅपल बोर या फळबांगाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल २ हजार ८४१ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्यावर तर १४८९ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गारपीट व वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू व वटाण्याचे पीक भूईसपाट झाल्याने त्यांच्या हाती काहीच येणार नसल्याचे चित्र आहे. रब्बीतील पिके हातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर केलेला लागवड खर्च आणि कर्जाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे शासन नुकसान भरपाईपासाठी कोणता निकष लावून मदत जाहीर करते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगरखरीप व रब्बीतील पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांनी बँका आणि सावकारांकडून उचल केलेल्या कर्जाची परफेड कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या डोंगरखाली आल्याचे चित्र आहे.