शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गुरूजींची फेरी विद्यार्थ्यांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यंदा ऑगस्ट महिना येऊनही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या गृहभेटी करण्याचे पत्रकाढले होते. परंतु या पत्रावरून काही शिक्षक संघटनांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या गृहभेटी ह्या कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत असल्याची टिका केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

ठळक मुद्दे१८५१ शिक्षक देतात ऑनलाईन शिक्षण : २१८५ शिक्षकांची स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांच्या दारी भेटी देऊन समस्या सोडवित आहे. गोंदिया जिल्ह्यातील २९ हजार विद्यार्थ्यांच्या दारी गुरूजींनी जाऊन त्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले आहे.मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यंदा ऑगस्ट महिना येऊनही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या गृहभेटी करण्याचे पत्रकाढले होते. परंतु या पत्रावरून काही शिक्षक संघटनांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या गृहभेटी ह्या कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत असल्याची टिका केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यातील २ हजार १८५ शिक्षकांनी २८ हजार ६३४ विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या आहेत.६९७ शाळांनी लिंकमध्ये माहिती भरली असून त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ६८ हजार २०६ आहे. परंतु यापैकी २८ हजार ६३४ विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षक पोहचले आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद वर्ग १ ते १० च्या अभ्यासक्रमावर आधारित क्लास घेत आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री ह्या वाहिणीवरून प्रसारीत होणाऱ्या टिली-मिली या कार्यक्रमातून २६ हजार ६६९ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात.जीओ टीव्हीच्या माध्यामातून ४ हजार ७९१ विद्यार्थी अभ्यास करतात. टिली-मिली या कार्यक्रमात वर्ग १ ते ३ री करीता १ तास, वर्ग ४ थी ते ६ वी पर्यंत २ तास, वर्ग ७ ते ८ वी करीता २ तास, वर्ग ९ ते १० करीता २ तास वेळ दिला जातो. सकाळी ८ ते १२ या काळात या कार्यक्रमातून विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. १८५१ शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.

कोरोना विषाणूमुळे शाळा बंद असल्या तरी अनेक विद्यार्थी विविध माध्यमातून ज्ञानार्जन करीत आहेत. आपापल्या सोयीनुसार हे शिक्षण सुरू आहे. शिक्षक स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांच्या गृहभेटी करीत आहेत.विद्यार्थ्यांच्या गृहभेटींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी जि.प.गोंदिया.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी