शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर गुरूजींचे उपोषण मागे

By admin | Updated: October 25, 2015 01:44 IST

तहसीलदारांनी तीन महिन्याचा अवधी मागत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अखेर सूर्यवंशी गुरूजींनी दुसऱ्याचे दिवशी ....

सूर्याटोलातील बांधतलाव : प्रशासनाने मागितला तीन महिन्यांचा अवधीगोंदिया : तहसीलदारांनी तीन महिन्याचा अवधी मागत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अखेर सूर्यवंशी गुरूजींनी दुसऱ्याचे दिवशी शुक्रवारी (दि.२३) आपले उपोशम मागे घेतले. बांधतलावात गैरकायदेशीररित्या करण्यात आलेले एन.ए. रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मागील १० वर्षापासून अडगळीत पडलेले प्रकरण आता मार्गी लागण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावातील भुखंडाचे अवैधरित्या झालेले अकृषक आदेश रद्द करणे व तलाव जागेवर अवैधरित्या तयार केलेली पाळ पाडण्यात यावी याकरिता सेवनिवृत्त मुख्याध्यापक डी.एस. सूर्यवंशी यांनी गुरूवारपासून (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेकडो पत्र व भेटी देवून अर्ज विनंत्या केल्या. तहसील कार्यालयापासून विभागीय आयुक्तांपर्यंत आपल्या मागणीसाठी चकरा त्यांनी मारल्या होत्या. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांनी त्यांची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र देवून हे प्रकरण तातडीने निकाली काढण्याचे निर्देशही दिले होते. परंतु कुंभकर्णी निद्रेत असलेल्या प्रशासनाला जागच येत नव्हती. उलट उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडून त्यांना अपमानित ही करण्यात आले व हाकलून देण्यात आल्याचेही प्रकार घडले. मात्र बांधतलावाचा मुद्दा मार्गी लावण्याचा निर्धार धरून त्यांनी विजयादशमीच्या दिवसापासून (दि.२२) उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला विविध संघटना व जनतेचा सतत पाठिंबा लाभत असल्याचे पाहून कुंभकर्णी झोपेतून प्रशासन खडबडून जागे झाले. परिणामी उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी शुकवारी (दि.२३)पविभागीय अधिकारी के.एन.के. राव व तहसीलदार संजय पवार यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार एस.बी. माळी यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. जिल्हाभर ही बातमी पसरल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनीही उपोषण मंडपाला भेट देऊन संबंधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवर चर्चा करुन उपोषणाचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. त्याचप्रकारे आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी परस्पर दुरध्वनीवर चर्चा करुन या आंदोलनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामाला प्रशासनास सामोरे जावे लागेल असे समजावून दिले. लोकांचा वाढता पाठींबा बघता प्रशासन नमले व सायंकाळी ३ महिन्याच्या आत या प्रकरणावर निर्णय घेवून निकाली काढण्याचे लेखी पत्र देवून नायब तहसीलदार माळी पुन्हा दुसऱ्यांदा उपोषण मंडपात दाखल झाले व उपोषण संपविण्याचा आग्रह केला. लेखी आश्वासन हाती आल्याने बांधतलाव जिर्णोद्धार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सल्यावरून रात्री ९ वाजता गुरूजींनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेत असल्याचे जाहीर केले. या आंदोलनासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आशिष नागपुरे, फुलचूरचे ग्रामपंचायत सदस्य मुकेश लिल्हारे, पुरुषोत्तम मोदी, जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव अमर वराडे यांच्यासह बांधतलाव जिर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला, राजकीय पुढारी तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)