शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

८०७ गावांवर शासनाचा अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 9:54 PM

राज्य शासनाने राज्यातील ८ तालुक्यात दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले. यात गोंदिया जिल्ह्यातील एकही तालुक्याचा समावेश नाही. गोंदिया जिल्ह्यातील ३६ गावात रोवण्याच झाल्या नव्हत्या. तर ७७१ गावातील पैसेवारी ५० पैश्याच्या आत होती.

ठळक मुद्देएकही तालुका दुष्काळग्रस्त नाही : तोंडाला पाने पुसल्याचा परशुरामकर यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने राज्यातील ८ तालुक्यात दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले. यात गोंदिया जिल्ह्यातील एकही तालुक्याचा समावेश नाही. गोंदिया जिल्ह्यातील ३६ गावात रोवण्याच झाल्या नव्हत्या. तर ७७१ गावातील पैसेवारी ५० पैश्याच्या आत होती. तरीही शासनाने जिल्हा दृष्काळग्रस्त घोषीत केला नाही. या सरकारने दुष्काळात होरपळत असलेल्या सर्वच घटकांचे तोंडाला पाने पुसली आहे, असा आरोप जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.जिल्हाधिकारी सरकारचे प्रतिनिधी असतात. जिल्हाधिकारी यांनी २८ डिसेंबर २०१७ ला सविस्तर अहवाल पाठविला. परंतु त्या अहवालाची सरकार दखल घेत नसेल तर हे सरकार काय कामाचे असा परखड सवाल परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यात १३०० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना फक्त ७५३ मि.मी. पावसाची नोंद झाली.ती सरासरचीच्या ५८ टक्के आहे. हे सर्व आकडे सरकारच्या यंत्रणेचेच आहेत. यामुळे जिल्ह्यात हजारो हेक्टर जमीन पडीत राहिली हे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण सर्वेक्षण करुन सरकारला २८ डिसेंबर २०१७ ला अहवाल सादर केला. त्यात जिल्ह्यातील एकूण ९५५ गावांपैकी पीक नसलेली ३६ गावे वगळून उर्वरित ९१९ गावांपैकी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १४८ गावे वगळून ७७१ गावांची पीक पैसेवारी ५० पैश्याच्या आत आहे, असा अहवाल सादर केला. परंतु सरकारने पूर्वी गोरेगाव, गोंदिया व तिरोडा या तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. काल (दि.२५) रोजी राज्यातील ८ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यात यवतमाळ येथील ५, वासीम १ व जळगाव २ अशा ८ तालुक्याचा समावेश आहे. यावेळीही गोंदिया जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आलेली आहेत. संपूर्ण जिल्हा राज्यात ज्यांची सत्ता आहे. त्यातच लोकप्रतिनिधीचे नेतृत्व आहे. तरीपण जिल्ह्यात दुष्काळ जाहीन न करुन येथील जनतेला दुष्काळाचे जाहीर न करुन येथील जनतेला दुष्काळाचे सोयी सवलतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. यावरुन येथील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी जनतेला न्याय देण्यात कमी पडत असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. पीक विम्याच्या नावावर शेतकऱ्यांना लुटण्यात आल्याच्याही प्रतिक्रिया उमटत आहेत.जिल्ह्याच्या अहवालाकडे दुर्लक्षविदर्भातच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात. सतत अवर्षण, नापीकी व कर्जाचा वाढता बोझा पाहून चहूबाजूने संकटात सापडलेल्या शेतकºयाला आत्महत्या करावी लागते. गोंदिया जिल्हा दुष्काळाच्या सावटात असतानाही गोंदिया जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्तच्या यादीत टाकले नाही. शासनाचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्याची पैसेवारी शासनाला सादर केली. परंतु त्यांनी दिलेल्या अहवालालाही शासनाने खोटे तर ठरविले नाही ना अशी शंका शेतकऱ्यांना येत आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही विदर्भातील शेतकºयांवर नाराज असल्याचा सूर शेतकºयांत आहे.