शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

शासन निर्णयाने झेडपीचा ११ कोटींचा निधी वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 9:22 PM

जिल्हा परिषदेला लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या कामांचा निधी वाटप करण्याचे अधिकार शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या जीआर नुसार आता पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसदस्यांची उच्च न्यायालयात धाव : पालकमंत्र्याकडे निधी वर्ग करण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेला लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या कामांचा निधी वाटप करण्याचे अधिकार शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या जीआर नुसार आता पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहे. शासनाने जिल्हा परिषदेच्या अधिकारात कपात करुन त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. याच निर्णयाचा फटका झेडपीच्या ११ कोटी रुपयांचा निधी बसला आहे. जि.प.ला हा निधी ६ आॅक्टोबरच्या पूर्वी प्राप्त झाला असल्याने तो खर्च करण्याचा अधिकार सुध्दा जि.प.ला असल्याचा ठराव घेण्यात आला आहे.गोंदिया जि.प.लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ च्या कामासाठी ११ कोटी ४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या लेखाशिर्षातंर्गत प्राप्त निधीतंर्गत कामांना मंजुरी देण्याचे अधिकार आत्तापर्यंत जिल्हा परिषदेला होते. तर हा निधीसुध्दा जि.प.कडे ६ आॅक्टोबरपूर्वीच वर्ग करण्यात आला. मात्र शासनाने ६ आॅक्टोबरला काढलेल्या जीआरनुसार या दोन्ही लेखाशिर्षा अंतर्गत प्राप्त निधी खर्च करण्याचे अधिकार आता पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे.त्यामुळे जि.प.ला प्राप्त झालेला ११ कोटी ४ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या मुद्दावरुन जि.प.च्या सर्वसाधरण सभेत सुध्दा वादंग निर्माण झाला होता. जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे यांनी जिल्हा परिषदेला हा निधी शासन निर्णयापूर्वी वर्ग करण्यात आला आहे.त्यामुळे या निधी अंतर्गत कामे वाटपाचा अधिकार हा जि.प.चा आहे. यानंतरही शासनाने जबरदस्ती केल्यास तसा ठराव घेवून उच्च न्यायालयात दाद मागण्याची मागणी केली. त्याला सभागृहाने सुध्दा मंजुरी दिली होती. तसेच जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांनी ही कामे जिल्हा परिषदेला करण्याचे अधिकार देण्यात यावे.यासंदर्भात ठराव घेवून शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे या दोन्ही विकास कामात खंड निर्माण होणार आहे. दरम्यान याविरुध्द एका जि.प.सदस्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीना देत जिल्हा परिषदेचे महत्त्व कमी केले. त्यानंतर आता लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ च्या कामे वाटपाचे जि.प.चे अधिकार कमी केले आहे. यामुळे हळूहळू जि.प.चे महत्त्व कमी करण्याचा डाव शासनाचा आहे. हा चुकीचा प्रकार असून या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करु.- गंगाधर परशुरामकरजि.प.सदस्य.

टॅग्स :zpजिल्हा परिषद