शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

गोठणगावची योजना आॅक्सिजनवर

By admin | Updated: December 11, 2014 23:10 IST

आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या या प्रकारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील योजना बंद आॅक्सिजनवर आली आहे. असे झाल्यास परिसरातील १५ गावांत पाण्यासाठी हाहाकार होणार आहे.

गोंदिया : आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या या प्रकारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील योजना बंद आॅक्सिजनवर आली आहे. असे झाल्यास परिसरातील १५ गावांत पाण्यासाठी हाहाकार होणार आहे. त्यामुळे ही योजना जिल्हा परिषदेने चालवावी अशी मागणी पाणी पुरवठा मंडळाने केली आहे. या मागणीसाठी मंडळाने ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यासह ग्रामाणी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
गोठणगावच्या या योजनेतून गोठणगाव येथील २२५, बोंडगाव ६०, सुरबन ३५, करांडली ११०, गंधारी ३०, रामनगर ४०, प्रतापगड ४५, मोरगाव १५०, निलज ४५, मालनकपूर २५, माहुरकूडा १०५, झरपडा ६५, बुधेवाडा २५, ताडगाव ४० व अर्जुनी येथील ४५० अशा प्रकारे या १५ गावांतील एकूण एक हजार ४०० कनेक्शधारकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र आजघडीला ही योजना चालविणाऱ्या पाणी पुरवठा मंडळाची आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या अशी स्थिती झाली आहे.
त्याचे असे की, प्रत्येक कनेक्शनधारकाकडून दरमहा ८० रूपये प्रमाणे एक लाख १२ हजार रूपयांची आवक आहे. तर योजनेचे महिन्याचे वीज बिल एक लाख ७५ हजार रूपये येत असून कर्मचाऱ्यांचा पगार व देखभाल दुरूस्तीपोटी ६० हजार रूपये असे एकूण दोन लाख ३५ हजार रूपयांचा खर्च होतो. म्हणजेच उत्पन्ना पेक्षा एक लाख २३ हजार रूपये जास्तीचा खर्च मंडळाला वहन करावा लागत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेकडून वीज बिलाची अर्धी रक्कम दिली जाते. मात्र तिही मंडळाने बील भरल्यानंतर दिली जात असल्याने अगोदर मंडळालाच वीज बिलाचा भरणा करावा लागतो. मात्र एवढी मोठी रक्कम मंडळाकडे राहत नसल्याने मंडळाची पंचाईत होते.
सध्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे तीन लाख ६० हजार ६६० रूपयांचे बील मंडळाकडे आले आहे. मात्र एवढी रक्कम नसल्याने मंडळ हे बील भरण्यास असमर्थ असून असे झाल्यास येत्या ३० तारखेपर्यंत विद्युत कंपनी वीज पुरवठा खंडीत करेल. असे झाल्यास योजना बंद पडून यावर अवलंबीत असलेल्या १५ गावांतील एक हजार ४०० कनेक्शनधारकांचे परिवार पाण्यापासून वंचित राहणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
अशात ही योजना जिल्हा परिषदेने स्वत:कडे घेऊन चालविण्याची मागणी पाणी पुरवठा मंडळाने केली आहे. यासाठी मंडळाने जिल्हाधिकारी यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ८ डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)