शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाची भुयारी गटार योजना बारगळली

By admin | Updated: September 18, 2016 00:28 IST

साडेतीन वर्षांपूर्वी मंजूर होऊन आणि योजनेचे काम सुरू करण्यासाठी पहिला हप्ता मिळूनही गोंदियातील बहुप्रतीक्षित भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरूवात होऊ शकली नाही.

दिलेले पैसे परत मागितले : तीन वर्षांपासून योजनेचे काम ठप्पकपिल केकत  गोंदियासाडेतीन वर्षांपूर्वी मंजूर होऊन आणि योजनेचे काम सुरू करण्यासाठी पहिला हप्ता मिळूनही गोंदियातील बहुप्रतीक्षित भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरूवात होऊ शकली नाही. राजकीय हेवेदाव्यांत अडकून पडलेली ही योजना अखेर शासनाने रद्द करण्याचे आदेश काढले आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी शासनाकडून मिळालेला निधी व्याजासह त्वरित परत करण्याचे आदेशही देण्यात आले. शासनाचा हा आदेश नगर परिषदेसाठी धक्कादायक ठरणारा आहे.शहराचा विकास व्हावा या उद्देशातून केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडून विविध योजनांसाठी निधी दिला जातो. गोंदिया शहरातील उघड्या नाल्यांमुळे येत असलेली दुर्गंधी कायमची दूर करण्यासाठी भूमिगत गटार योजना होणे गरजेचे होते. त्यासाठी जनप्रतिनीधींच्या प्रयत्नाने तत्कालीन आघाडी सरकारने गोंदिया शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर ेकेली होती. केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये १२५.७२ कोटींच्या या योजनेला मंजुरी दिली होती. तसेच नगर परिषदेस या योजनेसाठी पहिला हप्ता म्हणून ५७ कोटी ५९ लाख रुपये केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध करवून देण्यात आला होता.केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी अभियानातील प्रकल्पांसाठी ३१ मार्च २०१७ नंतर केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध होणार नाही, असे पूर्वीच केंद्र शासनाने स्पष्ट केले होते. या योजनेसाठी दुसऱ्या हप्त्याचा निधी मिळण्याकरिता पहिल्या हप्त्यातील ७० टक्के रक्कम खर्च झाल्याचे प्रमाणपत्र केंद्र शासनाकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र गेल्या तीन वर्षात कामाला सुरूवातही होऊ शकली नाही. या योजनेचे काम नगर परिषदेने करायचे की महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने हे ठरविण्यातच वेळ वाया गेला.या योजनेचा खर्च पाहता आणि नगर परिषदेला त्यात आपला वाटा उचलणे शक्य होणार नाही म्हणून ही योजना राज्य शासनाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला हस्तांतरीत करण्यात आली होती. मात्र नगर परिषदेचे पदाधिकारी ही योजना स्वत: राबविण्यासाठी अडून बसले होते. यात मात्र ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. त्यामुळे या योजनेला भविष्यात केंद्र शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता उरली नव्हती. इतके दिवस ही योजना रखडल्याने आणि मार्च २०१७ पूर्वी ७० टक्के निधी खर्च होणे शक्य दिसत नसल्याने ही योजना अखेर रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.व्याजासह निधी जाणार परत शहराची भुयारी गटार योजना रद्द करीत असतानाच या योजनेसाठी राज्य शासनाने नगर परिषदेला वितरीत केलेला केंद्र व राज्य शासनाच्या वाट्याचा निधी, त्यावर जमा झालेल्या व्याजासह राज्य शासनाकडे त्वरित परत करावा, असे निर्देश दिले आहे. नगर परिषदेकडे या योजनेसाठी ५७.५९ लाख रूपयांचा निधी मिळाल्याची माहिती आहे. आता त्यावर व्याज मिळून ही रक्कम राज्य शासनाकडे परत द्यावी लागणार आहे.