शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

गोंदियाची भुयारी गटार योजना बारगळली

By admin | Updated: September 18, 2016 00:28 IST

साडेतीन वर्षांपूर्वी मंजूर होऊन आणि योजनेचे काम सुरू करण्यासाठी पहिला हप्ता मिळूनही गोंदियातील बहुप्रतीक्षित भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरूवात होऊ शकली नाही.

दिलेले पैसे परत मागितले : तीन वर्षांपासून योजनेचे काम ठप्पकपिल केकत  गोंदियासाडेतीन वर्षांपूर्वी मंजूर होऊन आणि योजनेचे काम सुरू करण्यासाठी पहिला हप्ता मिळूनही गोंदियातील बहुप्रतीक्षित भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरूवात होऊ शकली नाही. राजकीय हेवेदाव्यांत अडकून पडलेली ही योजना अखेर शासनाने रद्द करण्याचे आदेश काढले आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी शासनाकडून मिळालेला निधी व्याजासह त्वरित परत करण्याचे आदेशही देण्यात आले. शासनाचा हा आदेश नगर परिषदेसाठी धक्कादायक ठरणारा आहे.शहराचा विकास व्हावा या उद्देशातून केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडून विविध योजनांसाठी निधी दिला जातो. गोंदिया शहरातील उघड्या नाल्यांमुळे येत असलेली दुर्गंधी कायमची दूर करण्यासाठी भूमिगत गटार योजना होणे गरजेचे होते. त्यासाठी जनप्रतिनीधींच्या प्रयत्नाने तत्कालीन आघाडी सरकारने गोंदिया शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर ेकेली होती. केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये १२५.७२ कोटींच्या या योजनेला मंजुरी दिली होती. तसेच नगर परिषदेस या योजनेसाठी पहिला हप्ता म्हणून ५७ कोटी ५९ लाख रुपये केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध करवून देण्यात आला होता.केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी अभियानातील प्रकल्पांसाठी ३१ मार्च २०१७ नंतर केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध होणार नाही, असे पूर्वीच केंद्र शासनाने स्पष्ट केले होते. या योजनेसाठी दुसऱ्या हप्त्याचा निधी मिळण्याकरिता पहिल्या हप्त्यातील ७० टक्के रक्कम खर्च झाल्याचे प्रमाणपत्र केंद्र शासनाकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र गेल्या तीन वर्षात कामाला सुरूवातही होऊ शकली नाही. या योजनेचे काम नगर परिषदेने करायचे की महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने हे ठरविण्यातच वेळ वाया गेला.या योजनेचा खर्च पाहता आणि नगर परिषदेला त्यात आपला वाटा उचलणे शक्य होणार नाही म्हणून ही योजना राज्य शासनाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला हस्तांतरीत करण्यात आली होती. मात्र नगर परिषदेचे पदाधिकारी ही योजना स्वत: राबविण्यासाठी अडून बसले होते. यात मात्र ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. त्यामुळे या योजनेला भविष्यात केंद्र शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता उरली नव्हती. इतके दिवस ही योजना रखडल्याने आणि मार्च २०१७ पूर्वी ७० टक्के निधी खर्च होणे शक्य दिसत नसल्याने ही योजना अखेर रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.व्याजासह निधी जाणार परत शहराची भुयारी गटार योजना रद्द करीत असतानाच या योजनेसाठी राज्य शासनाने नगर परिषदेला वितरीत केलेला केंद्र व राज्य शासनाच्या वाट्याचा निधी, त्यावर जमा झालेल्या व्याजासह राज्य शासनाकडे त्वरित परत करावा, असे निर्देश दिले आहे. नगर परिषदेकडे या योजनेसाठी ५७.५९ लाख रूपयांचा निधी मिळाल्याची माहिती आहे. आता त्यावर व्याज मिळून ही रक्कम राज्य शासनाकडे परत द्यावी लागणार आहे.