शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गोंदिया जिल्ह्यात सेल्फीच्या नादात दोन तरुणींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:38 PM

बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनर्सिंगचे प्रशिक्षण घेत होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही तरुणींचे मृतदेह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आले.मेघा सुखदेव शहारे (२१) रा.खमारी व समता कन्हैयालाल न्यायकरे (२०) रा. गिरोला दासगाव अशी मृत तरुणींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार गोंदियाच्या मरारटोली येथील युवा परिवर्तन संस्थेत नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या समता न्यायकरे, मेघा शहारे यांच्यासह त्यांच्या मैत्रिणी वर्ग सुटल्यानंतर बाघ नदीच्या कोरणी घाटावर फिरायला गेल्या होत्या. समता व मेघा नदीच्या काठावर एका दगडावर उभ्या राहून सेल्फी घेत होत्या.सेल्फी घेतांना दोघींचाही पाय घसरल्याने त्या नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या. दूर उभ्या असलेल्या त्यांच्या मैत्रिणीनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. मात्र नदीत पाणी अधिक असल्याने त्यांचा शोध वेळीच घेता आला नाही.घटनेची माहिती गोंदियाचे तहसीलदार भंडारी व रावणवाडीचे ठाणेदार सचिन सांडभोर यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. दोन्ही विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूची मदत घेण्यात आली. या घटनेमुळे खमारी व गिरोला गावात शोककळा पसरली आहे. रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

धोकादायक स्थळी सेल्फी घेणे टाळाअलीकडे तरुणी-तरुणींमध्ये सेल्फी घेण्याची क्रेज प्रचंड वाढली आहे. नदीच्या काठावर व धरणाजवळ सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. यानंतरही याबाबत युवक-युवती धडा घेत नसल्याचे दिसते. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे असा बोर्ड बाघ नदीच्या पात्रालगत सुध्दा लावण्यात आला आहे. मात्र यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Selfieसेल्फीDeathमृत्यू