शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

गोंदिया विधानसभा काँग्रेसकडेच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:36 IST

काँग्रेस नेत्यांनी आळवला सूर : काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व घरवापसी कार्यक्रम, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे कुणी कितीही या जागेवर दावा करीत असेल, तरी हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे कुणी काय बोलते याकडे फारसे लक्ष देऊ नका, जोमाने कामाला लागा, असा सूर गोंदिया येथे शुक्रवारी (दि. १३) आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आळवला. 

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक सर्कस ग्राऊंडवर काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा व माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या घरवापसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, सुनील केदार, नितीन राऊत, शिवाजीराव मोघे, नाना गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खा. डॉ. प्रशांत पडोळे, डॉ. नामदेव किरसान, श्यामकुमार बर्वे, मधू भगत, आ. सहषराम कोरोटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड व काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आता काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून, ही विजय रथाची सुरुवात असल्याचे सांगितले. प्रास्ताविक दिलीप बन्सोड मांडले. सूत्रसंचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले.

पटोलेंचा पटेलांवर निशाणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. या जिल्ह्याचा सत्यानाश केल्याचा आरोप त्यांनी केला. आता भाजपाशी हातमिळवणी करून ते जिल्ह्याचे वाटोळे करीत आहे. मात्र, त्यांनी आता आमच्या भानगडीत पडू नये, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

"महायुती सरकारमधील ईजा, बिजा आणि तिजाचे चेहरे लोकसभेनंतर पडले आहेत. ५६ इंचांची छाती ३२ इंचांची झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पारचे स्वप्न भंग झाल्यानेच लाडकी बहीण योजना आणली. राज्याला उद्ध्वस्त करण्याचे काम विद्यमान महायुती सरकार करीत आहे. जर्मनी मध्ये नोकरीची संधी" - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते

"तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ महिन्यांत कोसळले होते. तशीच स्थिती पुन्हा मोदी सरकारची होणार आहे. विधानसभा निवडणुकानंतर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे मोदी सरकारची साथ सोडतील अन् हे सरकार कोसळेल. भाजपाच्या अधःपतनाला सुरुवात झाली असून, माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी योग्य वेळी निर्णय घेतला आहे." - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

"पाच वर्षापूर्वी विकासाच्या नावावर मी भाजपात प्रवेश केला होता. तो माझा केवळ भ्रम होता. माझ्या या निर्णयामुळे तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते दुखावले होते. मी मनापासून या सर्वांची क्षमा मागतो. माझा हा पक्ष प्रवेश नसून घरवापसी आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची आता मी व्याजासह परतफेड करणार आहे."- गोपालदास अग्रवाल, माजी आमदार

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण