गाव तंटामुक्त करण्यासाठी घ्यावे लागतील १५0 गुण

By Admin | Updated: May 27, 2014 23:50 IST2014-05-27T23:50:03+5:302014-05-27T23:50:03+5:30

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबवितांना प्रत्येक पैलूवर नजर ठेवणे आवश्यक आहे. तंटे सोडविण्याबरोबर इतर बाबीकडे लक्ष दिल्याशिवाय गाव तंटामुक्त होणार नाही. आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी

To get rid of the village, you have to take 150 marks | गाव तंटामुक्त करण्यासाठी घ्यावे लागतील १५0 गुण

गाव तंटामुक्त करण्यासाठी घ्यावे लागतील १५0 गुण

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबवितांना प्रत्येक पैलूवर नजर ठेवणे आवश्यक आहे. तंटे सोडविण्याबरोबर इतर बाबीकडे लक्ष दिल्याशिवाय गाव तंटामुक्त होणार नाही. आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी २00 पैकी १५0 गुण घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या गावांचे कसे मुल्यमापन करावे यासंदर्भात शासनाने १४ ऑगस्ट २00८ च्या शासन निर्णयात या संदर्भात सर्व माहिती दिली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या समित्यांना पाच प्रकारच्या नोंदवह्या अद्यावत ठेवायच्या असतात. त्यापैकी तीन नोंदवह्यांना माहितीचा दस्तावेज असतो. यात नोंदवही १ मध्ये प्रतिबंधात्मक उपयायोजना, नोंदवही क्र.२ अ, नोंदवही क्र.३ अ चे गुणदान केले जाते.ईतर दोन नोंदवह्या क्र.२ ब व ३ ब मध्ये माहिती नमूद करायची असते. नोंदवही १ मध्ये प्रतिबंधात्मक उपय योजनेकरीता ८0 गुण देण्यात आले आहेत. यापैकी गाव पात्र करण्यासाठी किमान ५६ गुण घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेत गावात राबविलेल्या उपक्रमांची नोंद घेतलेली असते. नोंदवही २ अ करीता १00 गुण देण्यात आले आहेत. यापैकी तंटामुक्त गाव होण्यासाठी किमान ७0 गुण घेणे आवश्यक आहे. ३0 सप्टेंबर पर्यंत अदखलपात्र तंटे, तडजोड योग्य गुन्ह्यांची नोंद घेणे आवश्यक असते. नोंदवही ३ अ करीता २0 गुण आहेत.यातील किमान १४ गुण घेणे आवश्यक आहे. सदर नोंदवहीत १ ऑक्टोबर ते ३0 एप्रिल दरम्यान असलेल्या अदखलपात्र व तडजोड योग्य गुन्ह्यांची नोंद घेणे आवशञयक असते. नोंदवही १ मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना, नोंदवही २ अ, ३ अ यांच्या किंमान गुणांची बेरीज अनुक्रमे ५६, ७0 १४ अशी १४0 येत असली तरी गाव तंटामुक्त होण्यासाठी २00 पैकी किमान १५0 गुण घेणे आवश्यक आहे. तंटामुक्त गाव मोहीमेच्या स्पर्धेत उतरलेल्या तंटामुक्त गावांचे आंतर जिल्हा मुल्यमापन ५ जून ते ५ जुलै तर बाह्य जिल्हा मुल्यमापनाचा कालावधी १८ जुलै ते १५ ऑगस्ट करण्यात येणार आहे. या संदर्भात २0 ऑगस्टपुर्वी मुल्यमापन अहवाल संबधित पोलीस अधिक्षकांना सोपविण्यात येणार आहे.

नोंदवही २ ब मध्ये ३0 सप्टेंबर पर्यंतचे बिगर तडजोडीच्या गुन्ह्यांची नोंद केलेली नसते अश्या नोंदवह्यांना गुण दिलेले नाहीत. नोंदवही ३ ब मध्ये १ ऑक्टोबर ते ३0 एप्रिल दरम्यान बिगर तडजोडीच्या गुन्ह्यांची नोंद केलेली असते. या नोंदवहीलाही गुण देण्यात आले नाही. गठित करण्यात आलेल्या समितीला मुल्यमापनाची जाण असावी यासाठी २९ मे रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयातील सभागृहात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. समिती सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक दिलीप झळके यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: To get rid of the village, you have to take 150 marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.