शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

९० हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:54 IST

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर शेत जमिन सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठळक मुद्देधापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा २ : प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर शेत जमिन सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यास मदत होणार आहे.तिरोडा तालुक्यातीलच नव्हे तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील हरितक्रांतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार सिंचन प्रकल्प म्हणून धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ या प्रकल्पाकडे पाहिले जाते. या प्रकल्पामुळे गोंदिया जिल्ह्यातील ८० हजार ७२६ आणि भंडारा जिल्ह्यातील ९ हजार ४२० हेक्टर अशी एकूण ९० हजार १४६ हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होणार आहे.या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांना बरेचदा एका पाण्याने पिके गमवावी लागतात. तर पावसाअभावी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. शिवाय रब्बी पिके घेण्यापासून सुध्दा वंचित राहावे लागत आहे. मात्र या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिके घेण्यास मदत होणार असून दुष्काळी परिस्थितीवर मात करणे काही प्रमाणात शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यास मदत होवून त्यांचे जीवनमान सुधारणार आहे. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होवून हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन शासनाकडून या प्रकल्पासाठी ९१७ कोटी ३ लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. आत्तापर्यंत या प्रकल्पावर ६११ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला असून प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मंगळवारी या सर्व कामाची आ.रहांगडाले यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.या वेळी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पृथ्वी फाळके, उपभियंता पंकज गेडाम, तिरोडा तालुक्यातील सर्व पत्रकार, माजी उपसभापती व भाजपा विधानसभा प्रमुख डॉ.वसंत भगत, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, युवा मोर्चा महामंत्री संजू पारधी, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष गौरी पारधी, कृ.ऊ.बा.स.संचालक चत्रभुज बिसेन, तिरु पती राणे प्रामुख्याने उपस्थित होते.पाईप लाईनचे काम ४० टक्के पूर्णधापेवाडा टप्पा क्र .१ चे पाणी खळबंदा जलाशयात यशीस्वरीत्या सोडण्यात आले आहे. लाभ क्षेत्रांअंतर्गत १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. टप्पा २ द्वारे बोदलकसा, चोरखमारा, भदभद्या, संग्रामपूर, रिसाला या तलावात २ मीटर व्यासाच्या पाईप लाईनद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर असून ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईवैनगंगा नदीकाठावरील दुसºया टप्प्याच्या पंपहाऊसच्या कामाला मंगळवारी (दि.३) आ.विजय रहांगडाले यांनी अधिकारी आणि पत्रकारांसह भेट देऊन पाहणी केली.या ठिकाणी ८ पंप बसविण्यात येणार असून चार पंपाद्वारे बोदलकसा जलाशयात तर दोन पंपाद्वारे चोरखमारा जलाशयात पाणी सोडण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाईप लाईन जाईल त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आ.रहांगडाले यांनी सांगितले.तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागू नये, खरीपासह रब्बीचे पीक घेता येऊन त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम लवकारत लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पासाठी शासनाने निधी मंजूर केला असून निधीची कमतरता भासणार नाही. लवकरच या परिसरातील शेतकºयांची सिंचनाची समस्या दूर होईल.- विजय रहांगडाले,आमदार तिरोडा.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प