शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात नव्याने बांधलेल्या विहिरीत गुदमरून पिता-पुत्रासह दोन शेजारी मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:03 IST

गोंदिया जिल्ह्यात विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सालेकसा तालुक्यातील देवरी पानगाव येथे घडली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे विहिरीचे पूजन करण्यासाठी सुरू होती तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: नव्यानेच बांधलेल्या विहिरीचे पूजन करण्यासाठी विहिरीतीतले पाणी काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या पिता-पुत्रासह दोन शेजाºयांना आपले प्राण गमावावे लागल्याची धक्कादायक घटना सालेकसा येथे घडली. आमगाव तालुक्यातील कन्हारटोला येथे रहात असलेल्या भांडारकर पिता-पुत्रासह दोन शेजाऱ्यांचा २ जुलैला सकाळी करुण अंत झाल्याची घटना घडली. आत्माराम भांडारकर यांनी आपल्या घरासमोर विहीर बांधली होती. तिचे पूजन करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी १ रोजी संध्याकाळी विहिरीचे पाणी स्वच्छ करण्याच्या हेतूने विहिरीत ब्लिचिंग पावडर, फिटकरी, तुरटी यांचे मिश्रण टाकले होते.  विहिरीतले गढूळ व अस्वच्छ पाणी काढण्यासाठी मोटर पंप  लावण्यात आली होती. या मोटारीचा फूटवॉल काढण्यासाठी त्यांचा मुलगा झनकलाल हा विहिरीत उतरला. मात्र उतरल्याबरोबर त्याला अस्वस्थ वाटू लागले व तो कसातरी करू लागला. ते पाहताच आत्माराम हेही विहिरीत उतरले. काही क्षणातच दोघेही गतप्राण झाले.

ही घटना पाहणाऱ्या एका मुलाने तात्काळ शेजाऱ्यापाजाऱ्यांना आवाज दिला. ते ऐकून राजू भांडारकर व धनराज गायधने हे दोघेही विहिरीत उतरले. मात्र त्यांचाही गुदमरून मृत्यू झाला. या चौघांसोबतच राधेशाम नावाचा व्यक्तीही विहिरीत उतरत होता. मात्र अर्ध्यावर उतरल्यानंतर विहिरीतील विषारी वायूची गंभीरता लक्षात आल्याने तो वरती परत आला. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. या चौघांच्या अपघाती मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू