शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जिल्ह्यातील तीन तृतीयपंथीयांचेही नशिब फळफळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने आता तृतीयपंथीयांना स्वतंत्र लिंग ओळख निवडीचे स्वातंत्र्य दिले असून याचा राज्यातील तृतीयपंथीयांना ...

कपिल केकत

गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने आता तृतीयपंथीयांना स्वतंत्र लिंग ओळख निवडीचे स्वातंत्र्य दिले असून याचा राज्यातील तृतीयपंथीयांना लाभ होणार असतानाच जिल्ह्यात नोंद असलेल्या ३ तृतीयपंथीयांचेही या निर्णयानंतर नशिब फळफळले असेच म्हणावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निर्णयानंतर आता मतदान यादीतही तृतीयपंथीयांची नोंद वाढणार यात शंका नाही.

तृतीयपंथी म्हटल्यास आजही समाजात त्यांना हीन दृष्टीने बघितले जात असून लोकशाही असून सुद्धा त्यांना पाहिजे तसे स्वातंत्र्य अद्याप मिळालेले नाही. परिणामी आजही तृतीयपंथीयांना हा एक शाप वाटत असून ते समाजापासून अलिप्त राहतात. मात्र राज्यघटना जात, धर्म, शिक्षण, लिंग या बाबींवर नागरिकांमध्ये भेदभाव करता येत नाही यावर भर देते. तिथे निसर्गाने व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणीत केलेला भेदभाव हा एखाद्या अशा व्यक्तीला त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे मत न्यायालयाने मांडले असून तृतीयपंथीयास निवडणूक प्रक्रियेत लिंग ओळखीचे स्वातंत्र्य देऊन सहभागी केले जावे असे सुचविले आहे. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने तृतीय पंथीयांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लिंग ओळख दिली असून यानंतर आता तृतीयपंथीयांना निवडणुकीच्या फडातही उतरण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला आहे. या निर्णयाचा राज्यातील तृतीयपंथीयांना लाभ मिळणार असतानाच जिल्ह्यात नोंद असलेल्या तीन तृतीयपंथीयांसाठीही हा निर्णय अतिमहत्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, सध्या तृतीयपंथीयांची नोंद एका वेगळ्या रकान्यात केली जात असतानाच यापुढे मात्र त्यांना लिंग निवडता येणार आहे.

-----------------------------------

निवडणुकीत उतरण्याचा मार्ग मोकळा

तृतीयपंथीयांना अन्य व्यक्तींप्रमाणे सर्व अधिकार असतानाच आता या निर्णयानंतर निवडणुकीत लिंग निवडून उतरता येणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला घेऊन उच्च न्यायालयाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत एका तृतीयपंथीयाने आपले नशिब अजमावले होते. आता या निर्णयानंतर तृतीयपंथी आपल्या लिंग निवडीच्या स्वातत्र्यांचा उपयोग करून निवडणुकीच्या फडात उतरू शकतील.

-----------------------------

निर्णयानंतर नोंदणी वाढण्याची शक्यता

तृतीयपंथीयांना आजही खालच्या नजरेने बघितले जात असल्याने कित्येक तृतीयपंथीयांकडृून मतदान यादीत नाव नोंदणी करवून घेतली जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आजघडीला अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त दोन तर तिरोडा तालुक्यात फक्त एक अशा एकूण तीन तृतीयपंथीयांची नोंद आहे. त्यात आता लिंग निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यास मतदान यादीत नोंद करण्यासाठीची संख्या वाढणार यात शंका नाही.