शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

जिल्ह्यातील तीन तृतीयपंथीयांचेही नशिब फळफळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने आता तृतीयपंथीयांना स्वतंत्र लिंग ओळख निवडीचे स्वातंत्र्य दिले असून याचा राज्यातील तृतीयपंथीयांना ...

कपिल केकत

गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने आता तृतीयपंथीयांना स्वतंत्र लिंग ओळख निवडीचे स्वातंत्र्य दिले असून याचा राज्यातील तृतीयपंथीयांना लाभ होणार असतानाच जिल्ह्यात नोंद असलेल्या ३ तृतीयपंथीयांचेही या निर्णयानंतर नशिब फळफळले असेच म्हणावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निर्णयानंतर आता मतदान यादीतही तृतीयपंथीयांची नोंद वाढणार यात शंका नाही.

तृतीयपंथी म्हटल्यास आजही समाजात त्यांना हीन दृष्टीने बघितले जात असून लोकशाही असून सुद्धा त्यांना पाहिजे तसे स्वातंत्र्य अद्याप मिळालेले नाही. परिणामी आजही तृतीयपंथीयांना हा एक शाप वाटत असून ते समाजापासून अलिप्त राहतात. मात्र राज्यघटना जात, धर्म, शिक्षण, लिंग या बाबींवर नागरिकांमध्ये भेदभाव करता येत नाही यावर भर देते. तिथे निसर्गाने व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणीत केलेला भेदभाव हा एखाद्या अशा व्यक्तीला त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे मत न्यायालयाने मांडले असून तृतीयपंथीयास निवडणूक प्रक्रियेत लिंग ओळखीचे स्वातंत्र्य देऊन सहभागी केले जावे असे सुचविले आहे. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने तृतीय पंथीयांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लिंग ओळख दिली असून यानंतर आता तृतीयपंथीयांना निवडणुकीच्या फडातही उतरण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला आहे. या निर्णयाचा राज्यातील तृतीयपंथीयांना लाभ मिळणार असतानाच जिल्ह्यात नोंद असलेल्या तीन तृतीयपंथीयांसाठीही हा निर्णय अतिमहत्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, सध्या तृतीयपंथीयांची नोंद एका वेगळ्या रकान्यात केली जात असतानाच यापुढे मात्र त्यांना लिंग निवडता येणार आहे.

-----------------------------------

निवडणुकीत उतरण्याचा मार्ग मोकळा

तृतीयपंथीयांना अन्य व्यक्तींप्रमाणे सर्व अधिकार असतानाच आता या निर्णयानंतर निवडणुकीत लिंग निवडून उतरता येणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला घेऊन उच्च न्यायालयाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत एका तृतीयपंथीयाने आपले नशिब अजमावले होते. आता या निर्णयानंतर तृतीयपंथी आपल्या लिंग निवडीच्या स्वातत्र्यांचा उपयोग करून निवडणुकीच्या फडात उतरू शकतील.

-----------------------------

निर्णयानंतर नोंदणी वाढण्याची शक्यता

तृतीयपंथीयांना आजही खालच्या नजरेने बघितले जात असल्याने कित्येक तृतीयपंथीयांकडृून मतदान यादीत नाव नोंदणी करवून घेतली जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आजघडीला अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त दोन तर तिरोडा तालुक्यात फक्त एक अशा एकूण तीन तृतीयपंथीयांची नोंद आहे. त्यात आता लिंग निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यास मतदान यादीत नोंद करण्यासाठीची संख्या वाढणार यात शंका नाही.