पाच एकरातील रोवणी सडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:33+5:30
रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आमगावचे अभियंता यांच्याकडे केली होती. परंतु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाच एकरातील रोवणी सडली आहे.

पाच एकरातील रोवणी सडली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पुजारीटोला धरणातून वाहून जाणाऱ्या कालव्याचे पाईप दुरूस्त न केल्याने आठ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहून जात आहे. परिणामी पाच एकरातील रोवणी सडल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आमगावचे अभियंता यांच्याकडे केली होती. परंतु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाच एकरातील रोवणी सडली आहे. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने रोवणी करण्यासाठी म्हणून बाघ पाटबंधारे विभागाचा पुजारीटोला धरणातून जाणाऱ्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. मागील आठ दिवसांपासून कालवा सुरू असल्यामुळे रामाटोला येथील या पाईपला मोठे भगदाळ पडले आहे.
परिणामी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. राजू श्रीराम चौधरी, अशोक श्रीराम चौधरी, वसंत चौधरी, सोमा परतेती व मदन शिवपूरी या पाच शेतकऱ्यांची पाच ते सहा एकर रोवणी सडली. यासंदर्भात पाटबंधारे विभागाला कळवूनही त्यांनी लक्ष दिले नाही. ते पाईप दुरूस्त करून नुकसान झालेल्या शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी जि.प.सदस्य रमेश उर्फ छोटू बहेकार यांनी दिला आहे.