शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांनी भरले २०५ कोटींचे पीक कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:10 IST

३५ कोटी शिल्लक : खरिपात २४० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे खरीपात वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बियाणे व शेतीची इतर कामे करण्यासाठी आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून शासन आणि नाबार्ड अंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यंदा जिल्हा बँकेने २४० कोटी ८० लाख रुपयांचे वाटप खरीप हंगामात केले होते. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी २०५ कोटी रुपयांचे पीक कर्ज भरले.

राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकेच्या तुलनेत जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया सुलभ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल ही जिल्हा बँकेतून करतात. खरीप हंगामात जिल्हा बँकेने जिल्ह्यातील ४२८६७ शेतकऱ्यांना एकूण २४० कोटी ८० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले होते. पीक कर्जाची परतफेड करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च असते. या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केल्यास व्याजात सवलत मिळते व पुन्हा नवीन पीक कर्जाची उचल करणे सोपे जाते. बरेच शेतकरी ही डेडलाईन पाळतात. सोमवारी (दि. ३१ मार्चपर्यंत) जिल्ह्यातील पीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांनी २०५ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची परतफेड केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्जमाफीच्या घोषणेचा झाला परिणामलोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळेल या आशेने पीक कर्जाची परतफेड केली नाही. त्याचा परिणाम पीक कर्ज परतफेडीवर झाल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारgondiya-acगोंदियाfarmingशेतीFarmerशेतकरी