शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सन्मान निधीच्या लाभासाठी शेतकरी वेटींगवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 5:00 AM

गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी पडताळणीनंतर २ लाख २६ हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन तीन महिन्यांनी जमा केले जातात. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे पाच हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.

ठळक मुद्देपात्र पूर्ण शेतकऱ्यांना लाभ नाहीच : आत्तापर्यंत पाच हप्ते झाले जमा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेतंर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये पेशंन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेची देशभरात अंमलबजावणी करण्यात आलीे. यासाठी जिल्ह्यातील २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी २ लाख २६ हजार ४०० शेतकरी पात्र ठरले. मात्र पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण हप्त्यांचा लाभ अद्यापही मिळालाच नसल्याची धक्कादायक बाब उघकीस आली आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी पडताळणीनंतर २ लाख २६ हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन तीन महिन्यांनी जमा केले जातात. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे पाच हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. यात पहिल्या हप्ता एकूण १ लाख ३४ हजार ९० शेतकऱ्यांच्या खात्यावर, दुसऱ्या हप्ता १ लाख ९० हजार १२ शेतकºयांना, तिसऱ्या हप्ता १ लाख ५६ हजार ३९ शेतकरी, चौथ्या हप्ता १ लाख १० हजार १६३ शेतकऱ्यांना आणि पाचव्या हप्ता ७७ हजार ५७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आत्तापर्यंत जमा करण्यात आला आहे. पाच हप्ते जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्यातील जेवढे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी आत्तापर्यंत कधीच संपूर्ण पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सरासरी ४० हजारावर पात्र शेतकरी अजुनही या योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट केंद्र सरकारकडून रक्कम जमा केली जात असल्याने याची माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनाला सुध्दा नसते. रक्कम जमा झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला या ऑनलाईन रक्कम जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येची यादी उपलब्ध करुन देत असल्याची माहिती आहे. ज्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली तो उद्देश मात्र या योजनेचा लाभ संपूर्ण शेतकऱ्यांना मिळत नसल्याने साध्य होत नसल्याचे चित्र आहे.हप्ते जमा झाले नसल्याची ओरड कायमपंतप्रधान सन्मान निधी योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांना ही योजना सुरू झाल्यापासूनच या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पहिल्या हप्त्याची रक्कम झाली नसल्याने त्यांची यासाठी प्रतीक्षा कायम आहे. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा आणि तिसरा हप्ता जमा झाला नसल्याची तक्रार आहे. एकंदरीत सुरूवातीपासून या योजनेचा लाभ पूर्ण पात्र शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची बाब याद्यांवरुन स्पष्ट होते.पात्र आहे तर हप्ते जमा करण्याची अडचणया योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती महसूल व कृषी विभागाने ऑनलाईन केंद्र सरकारकडे पाठविली. तसेच पात्र शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक खाते क्रमांक सुध्दा त्यात जोडले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा न होण्याचे कारण गुलदस्त्यात आहे.शेतकऱ्यांची बँकामध्ये पायपीट कायमपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. याचा संदेश देखील संबंधित पात्र शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठविला जात आहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली नसल्याने त्यांची बँकामध्ये पायपीट कायम आहे. विशेष यासंबंधिची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी