शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पाखड धान खरेदी केंद्रावरुन बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

शेतकरी बांधव खरीप हंगामातील हलक्या धानाची दिवाळीपूर्वी कापणी आणि मळणी करुन विक्री करतात. यामुळे शेतकºयांना दिवाळी सण साजरा करण्यास मदत होते. सुदैवाने यंदा धान पिकांसाठी अनुकुल असा पाऊस झाल्याने धानपीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची कोंडी : फेडरेशन म्हणते शासनाचे आदेश नाही, परतीच्या पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका धान पिकांना बसला. परिणामी मोठ्या प्रमाणात धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड झाला. शेतकरी धानाची मळणी करुन तो धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेत आहेत. पण पाखड धान खरेदी करण्याचे आदेश नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात आहे.त्यामुळे पाखड धान खरेदी केंद्रावरुन बाद झाल्याने शेतकºयांची कोंडी झाल्याचे चित्र आहे.शेतकरी बांधव खरीप हंगामातील हलक्या धानाची दिवाळीपूर्वी कापणी आणि मळणी करुन विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करण्यास मदत होते. सुदैवाने यंदा धान पिकांसाठी अनुकुल असा पाऊस झाल्याने धानपीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकºयांना सुध्दा यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती. मात्र या अपेक्षेवर आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने पूर्णपणे पाणी फेरले. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची कापणी केली होती. कापणी केलेला धान बांध्यामध्ये पडून होता.याच दरम्यान परतीचा पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात धानाच्या कडपा भिजल्या.काही शेतकऱ्यांचे धान दोन तीन दिवस पाण्यात पडून राहिल्याने धानाला अंकुर फुटले तर काही धान पाखड झाले. त्यामुळे शेतकºयांनी धान खरेदी केंद्रावर पाखड झालेला धान खरेदी करण्याची सुट देण्याची मागणी शासनाकडे केली होती. शासन यावर नक्कीच काही तरी तोडगा काढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आता जेव्हा शेतकरी पाखड धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेत आहेत. तेव्हा तो धान खरेदी करण्यास नकार दिला जात आहे.त्यामुळे शेतकºयांना धानाची विक्री न करताच परतावे लागत आहे. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पाखड धान खरेदी करु नये असे निर्देश असल्याने खरेदी करता येत नसल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेने पाठविला ठरावजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी (दि.१४) पार पडली. यासभेत जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला आहे.त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड झालेला धान खरेदी करण्यात यावा. असा ठराव पारीत करुन तो शासनाकडे पाठविण्याची मागणी केली.याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. तसेच ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सभेला स्थायी समितीचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुध्दा उपस्थित होते.गोदामांचा प्रश्न कायमजिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते.मात्र खरेदी केलेला धान साठवणुकीसाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था करण्यात आली नाही.त्यामुळे गोदामांचा प्रश्न कायम आहे.हा प्रश्न सुध्दा मार्गी लावण्याची मागणी केली आहे.२५ हजार क्विंटल धान खरेदीजिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे मागील आठ दिवसांपासून एकूण ६२ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदीला सुरूवात केली आहे. या सर्व धान खरेदी केंद्रावरुन आत्तापर्यंत २५ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली असल्याचे फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती