तब्बल सहा महिने होऊनही शासन निधी नाही
By Admin | Updated: March 25, 2015 01:13 IST2015-03-25T01:13:56+5:302015-03-25T01:13:56+5:30
सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे उध्दवस्त झाली. त्या बेघर व्यक्तीना शासन स्तरावर मिळणारा निधी मिळाला नाही.

तब्बल सहा महिने होऊनही शासन निधी नाही
आमगाव : सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे उध्दवस्त झाली. त्या बेघर व्यक्तीना शासन स्तरावर मिळणारा निधी मिळाला नाही. निधी मिळावा या करिता अनेक तहसीलमध्ये येरझारा घालताना मात्र त्याच्या पदरी यश मिळाले नाही. त्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.
तहसीलमध्ये अतिवृष्टीचा आढावा प्रथम तलाठी यांच्याकडून घेतला जातो. नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य यांच्या सबंधीत अभियंताकडून किती अंदाजे नुकसान झाले याचे गणित काढले जाते. मात्र हे सर्व करून किती नुकसान भरपाई द्यावी हे शासनाकडून ठरलेले असल्यामुळे समाधान कारक नुकसान भरपाई मिळत नाही. बनगाव येथील एका अल्पसंख्याक व्यक्तीचा घर पडल्यानंतर त्याचा पंचनामा तलाठ्यानी केला. त्यात २० हजार रुपये नुकसानीची नोंद घेतली. त्यानंतर बांधकाम विभागाकडून अंदाजे किती नुकसान झाल्याची नोंद झाली. मात्र प्रत्यक्षात २० हजार रुपयाचे नुकसान होऊन फक्त २ हजार रुपये मिळणार असे लिपीकाकडून लाभार्थ्यांना सांगितले जातो. जर निधी किती द्याचा असे ठरले तर तलाठी किंवा अभियंत्याकडून नोंद घेण्याची गरज नाही किंवा लाभार्थ्याला सहा महिने नुकसान भरपाई करिता वाट बघण्याची आवश्यकता नाही. कार्यालयातील लिपीक हा काम करीत नाही. वेळकाढूपणा करतो. त्याच्यावर प्रथम कारवाही देयके गरजेचे आहे. तहसीलदार मात्र मौन बाळगुन आहेत. (तालुका प्रतिनिधी)