शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अवकाळीनंतर आता हत्तींच्या कळपाचे संकट, सहा महिन्यांनंतर एन्ट्री, भरनोली परिसरात धानाच्या पुंजण्याची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 18:43 IST

शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून नागणडोहमार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली. राजोली भरनोली येथील शेतकरी नीलकंठ बुधराम हारमी यांच्या शेतातील पाच एकरातील धानाच्या पुंजण्याची पूर्णपणे नासधूस केली. 

प्रकाश वलथरे - केशोरी : अवकाळी पावसाने मागील आठवड्यात सलग चार दिवस हजेरी लावून धानपिकांचे मातेरे करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. या संकटातून शेतकरी कसाबसा सावरत असताना शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात परत गेलेल्या हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली, नागणडोह परिसरात एन्ट्री करीत शेतातील धानाच्या पुंजण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तर हत्तींच्या कळपाचा मुक्काम याच परिसरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अवकाळीनंतर आता शेतकऱ्यांवर हत्तींच्या कळपाचे संकट उभे ठाकले आहे.

पश्चिम बंगालमधून दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी एन्ट्री करीत मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह, राजोली भरनोली, रामपुरी, बाक्टी व नवेगावबांध या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यानंतर हा हत्तींचा कळप नागणडोहमार्गे गडचिरोली जिल्ह्यात परत गेला होता. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून पुंजणे शेतात रचून ठेवले आहे. 

मागील आठवड्यात सलग अवकाळी पाऊस झाल्याने मळणीची कामे थांबली होती. तर दोन तीन दिवसांपासून वातावरणाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांनी धानाच्या मळणीची कामे सुरू केली आहेत. दरम्यान, शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून नागणडोहमार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली. राजोली भरनोली येथील शेतकरी नीलकंठ बुधराम हारमी यांच्या शेतातील पाच एकरातील धानाच्या पुंजण्याची पूर्णपणे नासधूस केली. 

यामुळे या शेतकऱ्यावर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान, भरनोली येथील शेतकऱ्यांनी याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वन कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच भरनोली येथे पोहोचत नुकसानीचे पंचनामे केले. तसेच हत्तींच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी पथक पाठविले.

कळपाचा भरनोली परिसरातच मुक्कामगडचिरोली जिल्ह्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाचा मुक्काम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली, नागणडोह परिसरात आहे. या कळपात २५ च्या वर हत्ती असल्याची माहिती आहे. या कळपाचा याच परिसरात मुक्काम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर अवकाळी पावसानंतर आता हत्तींच्या कळपापासून धानाच्या पुंजण्याचे संवर्धन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गावकऱ्यांना सजग राहण्याचा इशाराहत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली असून भरनोली परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घातला आहे. तर हत्तींच्या कळपाचा मुक्काम याच परिसरात असल्याने वन विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांना सजग राहण्याचा इशारा दिला आहे.

वन विभागाचे कर्मचारी हत्तींच्या कळपावर नजर ठेवून -रानटी हत्तींचे कळप जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक हत्तींच्या कळपाच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीPaddyभात