शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात अठरा गावांवर दूषित पाणी पिण्याचे संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 15:47 IST

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे बिल थकले : विद्युत पुरवठा होणार खंडित

रामदास बोरकर

नवेगावबांध (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत १८ गावांना नळ योजनेच्या माध्यमातून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. पण पाणी पुरवठा योजनेचे १० लाख ९८ हजार रुपयांचे वीज बिल थकले आहे. हे वीज बिल भरण्यासाठी महावितरणने नोटीस बजावली असून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या १८ गावातील गावकऱ्यांवर भर उन्हाळ्यात दूषित पाणी पिण्याचे संकट ओढविण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणून प्रती व्यक्ती ५५ लीटर प्रति व्यक्ती पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही बंद पडण्याचा मार्गावर आहे. या योजनेंतर्गत गोठणगाव तलाव येथील पाणी मोटारपंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये स्वच्छ करून अर्जुनी मोरगाव नगरपंचायत व गोठणगाव, सुरबन, बोंडगाव सूर, कराडली, गंधारी, प्रतापगड, रामनगर अर्जुनी मोर, मोरगाव, निलज, माहूरकुडा, मालकनपूर, ताडगाव, झरपडा, बुदेवाडा, बोळदे आदी १८ गावांना मागील १२ वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा केला जातो. पण शासनाच्या नवीन धोरणामुळे ही योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

१० लाख ९८ हजार रुपयांची वीज बिल थकले

पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी पूर्वी राज्य सरकारकडून प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० टक्के अनुदान दिले जात होते. त्यामुळे योजना चालविण्यासाठी येणारा खर्च व होणारी वसुली यामधील तूट भरून निघत होती. परंतु मागील तीन वर्षांपासून राज्य सरकारने प्रोत्साहन अनुदान देणे बंद केले. परिणामी जिल्हा परिषदेला विद्युत बिल भरणे अशक्य झाले आहे. १० लाख ९८ हजार रुपयांचे विज बिल थकीत आहे. परिणामी विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिली आहे. परिणामी गावकऱ्यांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.

योजना जि.प.कडे हस्तांतरित

ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरित असून सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समितीद्वारा संचालित खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाद्वारे चालविण्यात येत आहे. जि.प. सह झालेल्या करारानुसार देखभाल दुरुस्ती व विद्युत बिलाचे खर्च हे जिल्हा परिषद नियमित आजपर्यंत भरत आली. मागील मार्च महिन्यापासून जिल्हा परिषदेकडे विद्युत बिल भरायला पैसे नसल्यामुळे १० लाख ९८ हजार रुपयांचे बिल थकीत झाले आहे.

अर्जुनी नगर पंचायतकडे ३० लाख रुपये थकीत

प्रती नळ कनेक्शनला पाणी देण्याकरिता संस्थेला एका महिन्याला ३४० रुपये खर्च येतो. त्यापैकी १२० रुपये नळ कनेक्शन धारकांकडून वसूल केल्या जातात. तर उर्वरित निधी जि.प. देत होती त्यामुळे या योजना आजपर्यंत सुरळीत चालविल्या जात होती. कनेक्शनधारकांकडून शंभर टक्के वसुली होते कुठलीही थकीत बाकी राहत नाही. केवळ नगरपंचायत अर्जुनी मोरगाव यांच्यावर ३० लाख रुपये थकीत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यgondiya-acगोंदिया