शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:56 IST

हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. जुलै महिना अर्धा लोटला असतांना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी १९ हजार हेक्टरमध्ये केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

ठळक मुद्देरोवण्या व पेरण्या वाळण्याच्या मार्गावर : १९ हजार हेक्टरमध्ये पेरण्या, मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस, पाऊस न झाल्यास स्थिती गंभीर

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. जुलै महिना अर्धा लोटला असतांना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी १९ हजार हेक्टरमध्ये केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचनाच्या साधानाने रोवणी केली होती. मात्र पावसाअभावी ती सुध्दा वाळत आहेत. परिणामी रोवण्या वाळण्याच्या तर पेरण्या खोळंबण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.गोंदिया जिल्ह्यात धानाच्या लागवडीचे क्षेत्र आहे.जिल्ह्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस होतो. ऐवढा पाऊस धानाच्या शेतीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार ८३२ हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत एकूण १४ हजार ८५३ हेक्टरवर धानाचे पऱ्हे टाकले आहेत. तर १२०० हेक्टरमध्ये रोवणी झाली असून ३ हजार २३९ हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी आवत्या टाकला आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीच्या कामाला सुरूवात केली होती. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र मागील दहा बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने पेरणी आणि रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहे. उष्ण दमट वातावरणामुळे पेरणी केलेले बियाणे अंकुरण्याऐवजी वाळत आहेत. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरेजावे लागणार आहे.आधीच उधार उसणवारी करुन आणि सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे घेवून बºयाच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. रक्ताचे पाणी करुन व मोठ्या अपेक्षेने पेरणी केली.मात्र पावसाने पुन्हा दगा दिल्याने बळीराजा चिंतातूर आहे.दोन तीन दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास पुन्हा कुणाच्या दारात उभे राहायचे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना सतावित आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळे लावून आहेत.धरणांना पावसाची प्रतीक्षायंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेला तर जुलै महिन्याच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला जोमाने सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर पाऊस पुन्हा बेपत्ता झाल्याने नदी, नाले आणि सिंचन प्रकल्प सुध्दा कोरडे पडले असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील लहान, मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १५ ते १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पाणीटंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.पाणी टंचाईच्या समस्येत वाढभूजल पातळी ही सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर बºयाच प्रमाणात अवलंबून असते. मात्र यंदा पावसाची तूट कायम असल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गोंदिया, तिरोडा, गोरेगाव,आमगाव,अर्जुनी मोरगाव या पाच तालुक्यांना पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसण्याची शक्यता आहे.४४८ मि.मी.पाऊस पडणे होते अपेक्षितजिल्ह्यात धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे १५ जुलैपर्यंत किमान ४४८ मि.मी.पाऊस होणे अपेक्षीत होते. पण त्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ २३६ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. १९० मि.मी.पाऊस कमी पडला आहे.गोंदिया तालुक्यात २६५ मिमी, गोरेगाव २३६ मिमी, तिरोडा ३१५ मिमी, अर्जुनी मोरगाव २५६ मि.मी., देवरी १३६ मिमी,आमगाव २९२ मिमी., सालेकसा १९६ मिमी, सडक अर्जुनी १९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.लागवड खर्च जाणार वायापावसाअभावी धानाचे पऱ्हे वाळत असून येत्या दोन तीन दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते, बियाणे आणि शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पावसाअभावी केलेल्या पेरण्या संकटात आलेल्या आहे. येत्या आठवडाभरात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे. मात्र पाऊस न झाल्यास त्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येतील.- नंदकिशोर नयनवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदियामागील दहा बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेवून तातडीने उपाय योजना राबविण्याची गरज आहे.- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांनी आधीच कर्ज काढून खरीप हंगामाची तयारी केली.मात्र पावसाने पाठ फिरविल्याने त्यांना दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने प्रभावीपणे उपाय योजना राबविण्याची आवश्यकता आहे.- किशोर तरोणे, जि.प.सदस्य.