शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

पावसाने पाठ फिरविल्याने पेरण्या संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 9:42 PM

मागील आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर मधील पेरण्या संकटात आल्या आहेत. येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर । वरुणराजाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर मधील पेरण्या संकटात आल्या आहेत. येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात यंदा खरीपात १ लाख ९२ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.जून महिन्यातील संपूर्ण नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीची कामे आटोपली. जवळपास ९५ टक्के पेरणीची कामे आटोपली आहे. पेरणी केल्यानंतर एका दमदार पावसाची गरज असते. मात्र मागील आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने केलेल्या पेरण्या सुध्दा संकटात आल्या आहे. पंधरा दिवस पाऊस न झाल्यास शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर उष्णतामानात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी रोवणी सुरू केली आहे. या रोवणीला सुध्दा पावसाची गरज आहे. अन्यथा रोवणी वाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत. हवामान विभागाने सुध्दा जुलै ते आॅगस्ट महिन्या दरम्यान १५ दिवसांचा पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यातच आता पाऊस पुन्हा गायब झाला असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर कृषी विभागाने पंधरा दिवसात पाऊस न झाल्यास पेरण्या संकटात येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.जलाशयात अल्प पाणीसाठाजिल्ह्यातील छोट्या, मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पात देखील मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जलाशयांना सुध्दा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.अन्यथा पुन्हा पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उकाड्यात वाढमागील दोन दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने त्याचा सुध्दा पिकांवर परिणाम होत आहे. तर उकाड्यामुळे नागरिक सुध्दा त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कधी दमदार पाऊस होतो याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती