शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गोंदिया जिल्ह्यातील २१ गावांत दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 3:46 PM

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील एकूण ९२० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात तिरोडा तालुक्यातील ७ आणि गोंदिया तालुक्यातील १४ अशा एकूण २१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे.

ठळक मुद्दे८९९ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर : शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : महसूल विभागातर्फे दरवर्षी खरीप हंगामातील पैसेवारी काढली जाते. यावरून जिल्ह्यातील किती गावात नेमकी दुष्काळी परिस्थिती आहे, हे काढून त्या गावांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील एकूण ९२० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात तिरोडा तालुक्यातील ७ आणि गोंदिया तालुक्यातील १४ अशा एकूण २१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे, तर ८९९ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्यावर असल्याने या गावांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळणार नाही.

गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील एकूण ४० गावांना बसला होता. नदीकाठालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाला मुकावे लागले होते. या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सर्वेक्षणसुध्दा करण्यात आले होते. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, महसूल विभागाने जाहीर केलेल्या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ २१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दाखविली आहे, तर तब्बल ८९९ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर दाखवली आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ७९ पैसे आहे. त्यामुळे आता या २१ गावातीलच शेतकऱ्यांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही अन्यायकारक असून, ती रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

या मिळणार सवलती

५० पैशांच्या आत पैसेवारी असलेल्या गावांना शासनाकडून काही सवलती दिल्या जातात. यात शेतकऱ्यांचा शेत सारा माफ केला जातो. वीजबिलात ३३ टक्के सवलत दिली जाते. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाते. शिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाते.

 

टॅग्स :droughtदुष्काळ