पाणी पिताय ना : मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:59+5:302021-09-09T04:35:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कुठल्याही आजाराचे मूळ हे दूषित पाणी असू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी ...

Don't drink water: then be careful! | पाणी पिताय ना : मग काळजी घ्या !

पाणी पिताय ना : मग काळजी घ्या !

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कुठल्याही आजाराचे मूळ हे दूषित पाणी असू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे काविळ, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो हे आजार होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या दिवसात नागरिकांनी उकळलेले पाणी प्यावे तसेच बाहेरील व उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे. अन्यथा आपण साथीच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने उकळलेले पाणी पिणे सर्वाधिक चांगले असते. यामुळे साथीच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. पावसाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर पाणी पिताना काळजी घेतलेली बरी.

..............

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- उलटी, टायफाईड

कॉलरा, गॅस्ट्रो

व्हायरल, वायरल इन्फेक्शन

काविळ, अतिसार

..........................

आजाराची लक्षणे

१) गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी पिल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणे दिसू लागतात.

२) टायफाईड दूषित पाण्यामुळे होतो. पोटात दुखते, रुग्णाला ताप येतो, उपचार न केल्यास जंतू रक्तात मिसळतात.

३) उलट्या, ताप, लघवी पिवळी हाेणे, भूक न लागणे ही काविळची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना या आजाराची लक्षणे कायम राहतात.

..............

ही घ्या काळजी, पाणी उकळून प्या

- पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुवून त्यात पाणी भरावे.

- पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून आणि उकळून प्यावे.

- पाण्यामध्ये मेडिक्लोरचे काही थेंब टाकावे.

- बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

- पावसाळ्यात एवढी खबरदारी घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते.

........

गाेंदियाकर पितात दररोज ३५ हजार लीटर पाणी

गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. प्रतिव्यक्ती ३५ लीटर याप्रमाणे दोनवेळा पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शहरात दोन ठिकाणी पाणी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यातून पाणी शुध्द होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो.

..............

Web Title: Don't drink water: then be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.