शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

उत्सव व जयंतीचे कार्यक्र म सार्वजनिक स्वरूपात नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

कार्यक्र मात समाजबांधवांनी सहभागी होऊ नये असे डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या. पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीचा हा काळ असल्यामुळे पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे. मास्कचा वापर सर्वांनी केला पाहिजे.कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यात येऊ नये, तसेच धार्मिक कार्यक्रमाचे सार्वजनिक स्वरूपात आयोजन करण्यात येऊ नये असे सांगितले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करीत आहे. आपल्या देशात आणि राज्यात देखील कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अनेक लोक या विषाणूने बाधित होत असून काहींचा मृत्यू होऊन हे सत्र सुरूच आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून कोणीही घराबाहेर पडू नये. एप्रिल आणि मे महिन्यात येणारे विविध धर्माचे सण, उत्सव आणि जयंतीचे कार्यक्र म सार्वजनिक स्वरूपात साजरे करू नका. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विविध धर्माच्या धर्मगुरूंची सभा आयोजित करण्यात आली.या वेळी त्या बोलत होत्या. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे उपस्थित होते. डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, हा एप्रिल महिना आणि पुढील मे महिना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.या महिन्यात बाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल तर गर्दी टाळणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये, म्हणजे कोरोना विषाणूची साखळी आपल्याला खंडित करता येईल.या एप्रिल महिन्यात व पुढील मे महिन्यात विविध धर्माचे सण, उत्सव आणि जयंतीचे कार्यक्र म आहेत ते सार्वजनिक स्वरूपात साजरे न करता कौटुंबिक स्वरूपात सामाजिक अंतर राखून साजरे करावे असे धर्मगुरूंनी समाजबांधवांना आवाहन करून कौटुंबिक स्वरूपात हे साजरे करण्याबाबत कळवावे. धार्मिकस्थळी पूजाअर्चा करण्याचे काम केवळ धर्मगुरूंनी करावे.त्या कार्यक्र मात समाजबांधवांनी सहभागी होऊ नये असे डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या. पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीचा हा काळ असल्यामुळे पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे. मास्कचा वापर सर्वांनी केला पाहिजे.कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यात येऊ नये, तसेच धार्मिक कार्यक्रमाचे सार्वजनिक स्वरूपात आयोजन करण्यात येऊ नये असे सांगितले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याची ग्वाही उपस्थित सर्व धर्मगुरूंना यावेळी दिली. या सभेला जिल्ह्यातील विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी