शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात जिल्ह्याचा नऊ लाखांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे, यादृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न असून, यातूनच आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे, यादृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न असून, यातूनच आता जिल्ह्याने नऊ लाखांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील ९,१८,४१८ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी ७० एवढी आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच असून, ही संख्या वाढविण्यावर आरोग्य विभागाचा जोर आहे.

लसीकरणाच्या सुरूवातीपासूनच जिल्हा अग्रेसर राहिला आहे. विशेष म्हणजे १८-४४ वर्ष वयोगटाला परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाला आणखीन गती मिळाली आहे. शिवाय जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे, यासाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. यामुळेही लसीकरणाला गती मिळाली आहे. याचेच फलित आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत ९,१८,४१८ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी ७० एवढी आहे. यामध्ये पहिला डोस घेणारे ६,८१,७२२ नागरिक असून, त्यांची टक्केवारी ५२ एवढी आहे तर दुसरा डोस घेणारे २,३६,६९६ नागरिक असून, त्यांची टक्केवारी ८१ एवढी आहे.

सध्या सणासुदीचे दिवस असून, नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे धोका वाढत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशात नोव्हेंबरपूर्वी नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कारण लस न लागलेली एक व्यक्तीही लस घेणाऱ्या व्यक्तींसाठीही धोक्याची ठरू शकते. मात्र, यानंतरही कित्येक नागरिकांनी आतापर्यंत एकही लस घेतलेली नाही तर कित्येकांनी पहिला डोस घेतला असून, आता दुसऱ्या डोसला टोलवत आहेत. हा प्रकार सर्वांसाठीच धोक्याचा आहे.

----------------------------------

आपल्या कुटुंबीयांसाठी तरी लसीकरण करा

लस हाती आली असतानाही कोरोनाची दुसरी लाट अधिकच धोक्याची ठरली. मात्र, व्यापक लसीकरण न झाल्याने कोरोनाने हा डाव साधल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. कारण लस न लागलेली एक व्यक्ती कित्येकांना बाधित करू शकते व हाच प्रकार दुसऱ्या लाटेत घडला. यामुळे लस न घेणाऱ्यांनी स्वत:साठी नाही तर किमान आपल्या कुटुंबीयांसाठी तरी लस घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

--------------------------------

दुसरा डोस वेळेवर घ्या

मुदत संपूनही जिल्ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस घेतलेला नाही. आता त्यांना कोरोना गेल्यासारखे वाटत असून, ते दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र कोरोना गेला नसून, दुसरा डोस घेतल्याशिवाय आपण पूर्णपणे सुरक्षित नाही, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी वेळेवर दुसरा डोस घ्या, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले आहे.