शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जिल्हाधिकाऱ्यांनी केली सिरपूर जलाशयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:31 PM

मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईग्रस्त गावांना भेट : उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दरम्याची याची दखल घेत जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी देवरी तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट दिली. तसेच सिरपूर जलाशयाची पाहणी केली.सिरपूरबांध, मकरधोकडा, शिलापूर, पदमपूर या वाघ नदीलगत असलेल्या गावांमध्ये यंदा पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने या परिसरातील गावातील विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणूजे याच तालुक्यातील मोठे सिरपूर जलाशय असून या जलाशयाचे पाणी या परिसरातील गावकऱ्यांना मिळत नसल्याने गावकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी (दि.९) ग्रामपंचायत सिरपूरबांधला भेट देवून पाणी टंचाई संदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली.संबंधित विभागाच्या अधिकाºयांना यावर वेळीच उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. सिरपूर जलाशय हे गावालगत असून एप्रिल-मे महिन्यात या जलाशयातून दरवर्षी पाणी सोडले जाते.त्यामुळे बाघ नदीमध्ये बाराही महिने पाणी वाहत असल्याने परिसरातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही. परंतु यावर्षी जलाशयात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असून सुद्धा पाणी का सोडण्यात येत नाही असा प्रश्न गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना केला. त्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या शाखा अभियंता यांच्यासह सिरपूर जलाशयाला भेट दिली.पाणीसाठा पाहिल्यानंतर लवकरच पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, पंचायत विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रा.पं.पदाधिकारी व ग्रामवासी उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीDamधरण