शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

रबीच्या कर्जवाटपातही जिल्हा बँक आघाडीवर

By admin | Updated: February 3, 2015 22:56 IST

गोंदिया- शेतकऱ्यांसाठी ठरवून देण्यात आलेल्या पीक कर्जवाटपात खरीपाप्रमाणेच रबीच्या वाटपातही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक कर्जवाटप करून आघाडी घेतली आहे.

२१.३५ कोटींचे वाटप : उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरूगोंदिया : गोंदिया- शेतकऱ्यांसाठी ठरवून देण्यात आलेल्या पीक कर्जवाटपात खरीपाप्रमाणेच रबीच्या वाटपातही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक कर्जवाटप करून आघाडी घेतली आहे. दिलेले उद्दीष्ठ गाठण्याकडे जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे. येत्या काही दिवसांत त्यांची उद्दीष्टपूर्ती होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.जिल्ह्यात रबी हंगामात ६८.७३ कोटी कर्जवाटपाचे लक्ष्य सर्व बँकांना दिले होते. त्यात जिल्हा बँकेला ३५.६२ कोटींचे उद्दीष्ट होते. ३१ डिसेंबरपर्यंत त्यापैकी २१ कोटी ३५ लाखांचे कर्जवाटप जिल्हा बँकेने केले आहे. जिल्हा धानाचे कोठार म्हणून ख्यातनाम असला तरिही निसर्गाची मार बसत असल्याने येथील शेतकरी पाहिजे तेवढा धनसंपन्न झालेला नाही. परिणामी येथील शेतकऱ्याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच लागले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते. राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे काय तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात.येथे विशेष बाब अशी की, कृषी कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत व खाजगी बँकापेक्षा जिल्हा बँक नेहमीच अग्रणी असल्याचे निदर्शनास येते. त्याचे असे की, राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांना सन २०१४-१५ मधील खरिप हंगामासाठी ४६८२ लाखांचे तर रबी हंगामासाठी २००६ लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. यात या बँकांकडून खरिपात सहा हजार ७० खातेधारकांना ३६८७ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. रबीत २५९ खातेधारकांना १९२ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ग्रामीण बँकांत बघायचे झाल्यास फक्त विदर्भ कोंकण ग्रामीण बँक कार्यरत असून त्यांना खरिपाचे ३०४४ लाखांचे तर रबीचे १३०५ लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट आहे. यात ग्रामीण बँकेने खरिपात चार हजार ८०० खातेधारकांना २३०१ लाखांचे तर रबीत १३५ खातेधारकांना ८१ लाखांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाच्या या कारभारात येथील जिल्हा मध्यवर्ती बँक अग्रणी दिसून येत आहे. त्याचे असे की, जिल्हा बँकेला खरिपात ८३१३ लाखांचे तर रबीत ३५६२ लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात जिल्हा बँकेने खरिपात २९ हजार ५२३ खातेधारकांना ९४१४ लाखांचे कर्जवाटप केले आहे. म्हणजेच दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्तीचे कर्जवाटप करण्यात आले आहे. शिवाय रबीसाठी आतापर्यंत ६२ खातेधारकांना २१३५ लाखांचे कर्जवाटप बँकेने केले आहे. रबीच्या हंगाम सुरूवातीत असल्याने येत्या काही दिवसांत बँकेची उद्दीष्टपूर्ती होणार यात शंका दिसून येत नाही. (शहर प्रतिनिधी)राष्ट्रीयकृ त बँका माघारल्याकर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँकाही सहभागी झाल्याचे दिसते. यात बँक आॅफ इंडियाने खरिपात १६३६ लाखांपैकी १२०२ लाखांचे तर रबीत ७०१ लाखांपैकी ८० लाखांचे कर्जवाटप केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्रने खरिपात १०८४ लाखांपैकी ६९२ लाखांचे कर्जवाटप केले आहे. तसेच स्टेट बँक आॅफ इंडियाने खरिपात ७६८ लाखांपैकी ६७१ लाखांचे कर्जवाटप केले आहे. त्यानंतर अन्य बँकांचाही कमीप्रमाणात कर्जवाटपात सहभाग आहे. १४३९.४६ लाखांची वसुली जिल्हा बँकेला २४५७१.५७ लाख रूपयांची थकीत तर १००२९.७१ लाखांची चालू अशाप्रकारे एकूण ३४६०१.२८ लाखांची कर्जवसुली करायची होती. त्यातील १२९८.०८ लाख रूपयांची मुद्दल तर १४१.३८ लाखांचे व्याज अशाप्रकारे एकूण १४३९.४६ लाखांची वसुली जिल्हा बँकेने केली आहे. वरिल आकडेवारी ३० जानेवारी पर्यंतची आहे.