शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

शेतकरी गटांना रोवणी यंत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत मानव विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले. शेतीमध्ये यांत्रिकीपद्धतीचा वापर व्हावा. या हेतूने चालू हंगामात रोवणी यंत्राद्वारे जवळपास १०० एकर क्षेत्रामध्ये भात पिकाची रोवणी करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी ...

ठळक मुद्देरोवणीचा खर्च कमी : १०० एकरामध्ये धान रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत मानव विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले. शेतीमध्ये यांत्रिकीपद्धतीचा वापर व्हावा. या हेतूने चालू हंगामात रोवणी यंत्राद्वारे जवळपास १०० एकर क्षेत्रामध्ये भात पिकाची रोवणी करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, आत्माचे तालुका समन्वयक विलास कोहाडे यांनी दिली.शेतीमधून विविध पिके घेण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च येतो. पारंपरिक पद्धतीला बगल देऊन तंत्रशुद्ध आधुनिक पद्धतीने पिकाची लागवड करुन जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळावा यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकºयांना कृषीविषयक मार्गदर्शन करुन प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहे. शेतीमध्ये यंत्रांचा वापर होण्यासाठी शेतकºयांना सातत्याने प्रवृत्त केले जात आहे. मानव विकास योजनेंतर्गत तालुक्यातील सोमलपूर, चान्ना, बाक्टी, धाबेटेकडी, कान्होली, बुधेवाडा, वडेगाव-बंध्या, झाशीनगर, कवठा, सिलेझरी, गोठणगाव, महागाव, माहुरकुडा, बोंडगावदेवी या ठिकाणच्या २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचा पुरवठा करण्यात आला.रोवणी यंत्राचा वापर कसा करावा, यंत्राद्वारे रोवणीसाठी मॅटनर्सरी कशी तयार करावी याबाबतचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण कृषी अधिकारी कार्यालयाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, महिंद्रा कंपनीचे नितीन मेश्राम यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जावून दिले. सदर रोवणी यंत्राद्वारे भात पिकाची रोवणी केल्यास बियाण्यांची बचत होते. तसेच प्रती एकर रोवणीचा खर्च ६०० रुपये येतो. मनुष्य बळाने रोवणी केल्यास खर्चाचा प्रमाण जास्त असते. रोवणी यंत्राच्या वापराने २ हजार रुपयाची प्रति एकर बचत होते.तालुक्यात १०० एकरामध्ये रोवणी यंत्राद्वारे धानाची रोवणी करण्यात आली असून आजघडीला धानाची लागवड सुस्थितीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. उत्पादन खर्च कमी येवून जास्त प्रमाणात फायदा होण्यासाठी शेतकºयांनी यांत्रिकीकरणाची कास धरावी, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.आधुनिकीकडे वाटचालग्रामीण भागात अलीकडे मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांची गैरसोत होत होती. त्यामुळे शेतकºयांनी यांत्रिकीकरणाची कास धरली. सध्या शेतकरी आधुनिकीकरणाकडे वळला आहे. शासनाकडूनही त्यांना मदत मिळत आहे.