शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

केंद्राच्या योजना आणून विकास करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:51 PM

गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकऱ्यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले.

ठळक मुद्देनवनिर्वाचित खा.सुनील मेंढे यांचे जंगी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकऱ्यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले.अर्जुनी-मोरगाव येथील वात्सल्य सभागृहात शुक्रवारी (दि.२४) आयोजित सत्कार सभारंभात ते बोलत होते. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी ते आले होते. ढोल-ताशाच्या गजरात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. वात्सल्य सभागृहात एका सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे, पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, नगरसेवक देवेंद्र टेंभरे, बाजीराव तुळशीकर, जि.प.चे माजी बांधकाम सभापती प्रकाश गहाणे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.मेंढे म्हणाले, लोकसभेची निवडणूक एक परीक्षा होती. त्या परीक्षेत मतदारांच्या आशिर्वादामुळे आपण उत्तीर्ण झालो. हे जनतेचा आशिर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षे कुठलीही रजा न घेता देशासाठी जे काम केले त्याची ही पावती आहे. मी नेता नाही, यापूर्वी कुठलीही आमदारकीची निवडणूक लढलो नाही. केवळ भंडारा नगरपरिषदेचा अध्यक्ष आहे. वंशपरांपरागत राजकीय वलय नसताना सामान्य कार्यकर्त्यापासून खासदार बनलो. मला हा बहुमूल्य सम्मान कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारांच्या आशिर्वादामुळे प्राप्त झाला. मागील खासदारांनी पक्षाशी बेईमानी केली. दुसºया पक्षात प्रवेश केला. व बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढली. त्यांना आमच्या नेत्याने त्यांची जागा दाखविली. त्यांच्या कार्यकाळात विकास कामांचा जो अनुशेष होता ती व नवीन भरीव विकासाची कामे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.ना.राजकुमार बडोले म्हणाले, कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारांच्या सहकार्यामुळे भाजपचा येथे विजय झाला. पोट निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची आघाडी संपवून त्यापेक्षा अधिकची आघाडी आम्ही या विधानसभा क्षेत्रात घेतली. आपण ज्या विश्वासाने मताधिक्य दिले त्याच विश्वासाने जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करु.या विश्वासाला तडा जाणार नाही अशी हमी त्यांनी दिली.पत्रकार संघानेदिले निवेदननवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील संकुल परिसरात १० वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करुन गार्डन व कान्फरन्स हॉलचे एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. या कालावधीत वापर न होता सुद्धा ते डागडुजीस आले आहे. शासन व प्रशासनच्या कुंभकर्णी निद्रेमुळे ते अद्यापही तसेच आहे. त्याचे लोकार्पण अजूनही होऊ शकले नाही.याची दखल घेण्याचे निवेदन तालुका पत्रकार संघातर्फे खा.सुनील मेंढे यांना देण्यात आले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले