शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

वैनगंगेच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर : जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १० गावांना पुराचा वेढा निर्माण झाला होता. यामुळे किडंगीपार आणि किन्ही येथील १०५ नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी सुरक्षीत स्थळी हलविले होते. मंगळवारी (दि.१०) वैनगंगा नदीच्या पातळीत ६ फुटाने घट झाल्याने जनजीवन पूर्वपदावर आले.तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे किन्ही येथील १०६ गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरक्षीत स्थळी हलविले होते. या नागरिकांची व्यवस्था गोंडमोहाडी येथील लक्ष्मणराव मानकर आदिवासी निवासी आश्रम शाळेत करण्यात आली होती. या नागरिकांच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली होती.तसेच जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी येथे भेट देऊन सोयी सुविधांचा आढावा घेतला.सोमवारी वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रातून रेती काढतांना चार जण पुरात अडकले होते. वैनगंगेच्या काठावर असलेल्या किन्ही येथे पुरात अडकलेल्या चार जणांना जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवित रेस्क्यू आॅपरेशन राबवून सुखरुप वाचविले. यात हमीरपूर येथील दीपलसिंह मोहनसिंह गौर, दौरया येथील संदीप महेंद्र यादव, बरेली येथील सुनीलसिंह बिरजलालसिंह चव्हाण व मुरादाबाद येथील रूहमसिंह देवीराम सैनी (३०) हे होते. हे चौघेही जेसीबी काढत होते. तेथे चारही बाजूने पाऊस आला.त्यावेळी ते चारही जेसीबीवर बसले होते. जिल्हाधिकारी कार्यालयच्या शोध व बचाव चमूने रेस्क्यू टिमने सुरक्षित बाहेर काढले. किशोर टेंभूर्णे, राजकुमार बोपचे,जसवंत रहांगडाले,धीरज दुबे, रवींद्र भांडारकर, चुन्नीलाल मुटकुरे, इंद्रकुमार बिसेन,अनिल नागपुरे, चंद्रशेखर बिसेन, मुरलीधर मुदोडकर यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबविले.या अभियानात पोलीस कर्मचारी सुभाष कश्यप, नरेश उईके, इमरान सैयद, संदीप कराडे, रूपेंद्र गौतम, गिरधारी पतेह, जबरान चिखलोंढे, बाबरे,गजभिये व जावेद पठान यांचा समावेश आहे.पुजारीटोला धरणाचे दरवाजे बंदसालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे एक फुटाने तर कालीसराड धरणाचे २ दरवाजे आणि संजय सरोवर धरणाचे २ दरवाजे मंगळवारी सकाळी उघडण्यात आले होते.या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र सायंकाळी ७ वाजता पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे बंद करण्यात आले.शहरात जोरदार पावसाची हजेरीदोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहरात जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. या पावसाचा फटका गणेशोत्सव मंडळांना सुध्दा काही प्रमाणात बसला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर