शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

धोका वाढला ! तालुक्यात निघाले ३ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:32 AM

गोंदिया : हळुवार का असेना मात्र कोरोना जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसत आहे. कारण, जिल्हा नियंत्रणात असला तरीही ...

गोंदिया : हळुवार का असेना मात्र कोरोना जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसत आहे. कारण, जिल्हा नियंत्रणात असला तरीही शुक्रवारी (दि. १७) गोंदिया तालुक्यात तब्बल ३ बाधित निघाले आहेत. यामुळे आता धोका वाढताना दिसत असून, नागरिक मनमर्जीने वागताना दिसत आहेत. यावर मात करण्यासाठी आता खबरदारी व लस या दोनच गोष्टींची गरज आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगाला थरकाप आणणारा आहे. त्यानंतर शासनाने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन व लवकरात लवकर लसीकरण या दोनच गोष्टींवर भर देण्याचे आवाहन केले आहे. मात्र आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने नागरिकांनी नियम व लस या दोघांनाही बाजूला टाकले आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून, गर्दी वाढतच चालली आहे. परिणामी धोकाही वाढत असून, शुक्रवारी (दि. १७) तालुक्यात तब्बल ३ बाधित निघाले आहेत. मागील २-३ महिन्यांतील ही सर्वाधिक आकडेवारी दिसून येत आहे.

त्यातही गोंदिया तालुका हॉटस्पॉट असून, येथेच सर्वाधिक बाधित व मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. आता त्यात आणखी ३ बाधितांची भर म्हणजे, धोक्याची घंटाच वाटत आहे. अशात आतातरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असून, सध्या फक्त गोंदिया तालुकाच कोरोना बाधित दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी पुढचा धोका टाळण्यासाठी आतापासून नियमांचे पालन व लसीकरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

-----------------------------------

लसीकरणाची गती मंदावली

जिल्ह्यात मध्यंतरी दररोज १५,००० ते १६,००० नागरिकांचे दररोज लसीकरण होत होते. यामुळेच आता जिल्ह्याने ९,३१,५८० नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला असून, त्याची टक्केवारी ९० टक्के एवढी आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोजची आकडेवारी ११,००० च्या आतच दिसून येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावयाचे असल्याने ही स्थिती व्यवस्थित नाही. करिता आता नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन सुरक्षित व्हायची गरज आहे.

-------------------------------

दुसरा डोस गरजेचा

जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने कित्येकांनी आता कोरोना गे,ला असा संभ्रम पाळून लसीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर फक्त २३ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यावरून नागरिकांनी आता कोरोना नसल्याने डोस घेण्याची गरजच काय, अशी समज बाळगल्याचे दिसते. मात्, दोन्ही डोस घेतल्याशिवाय सुरक्षा नाही. करिता लवकरात लवकर दुसरा डोस घेण्याची गरज आहे.