शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 5:00 AM

या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असून नवीन आदेश काढून त्यांचा दुसऱ्या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत या कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत न करता त्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली.

ठळक मुद्देशासनाने दिले सेवा समाप्तीचे आदेश : दोन हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.पाणी व स्वच्छतेत उत्कृष्ट कामिगरी करणाऱ्या राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपासून सेवामुक्त करण्याचे आदेश काढले आहे. या आदेशामुळे या विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नये असे शासनाचे धोरण आहे. मात्र शासनाने स्वत:च या धोरणाला हरताळ फासत राज्यातील दोन हजार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश दिल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असून नवीन आदेश काढून त्यांचा दुसऱ्या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत या कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत न करता त्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली. यावर पाणी पुरवठा मंत्र्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी आ.मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे आणि अधिकारी उपस्थित होते. पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म व जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद व तालुक्याच्या पंचायत समितीच्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. आजघडीला त्यांची संख्या सुमारे दोन हजारांच्या घरात आहे.या कर्मचाऱ्यांनी आयुष्याची उमेदीची वर्षेे घालवली, हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेसाठी आटापिटा केला. गुडमॉर्निंग पथकासाठी पहाटेपासून गावोगाव पिंजून काढले, स्वच्छतेबाबत गावस्तरावर स्वच्छता विषयक जनजागृतीचे काम केले. अशा कर्मचाऱ्यांना घरी बसविण्याचा घाट शासनाने घातला आहे. यातील अनेक कर्मचारी वयाची पन्नासी ओलांडलेले आहेत.या सर्व कर्मचाऱ्यांचे संसार आता मोडकळीस येणार आहे.या कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामिगरीच्या बळावर अनेक अधिकाºयांना पदोन्नती प्राप्त झाली. परंतु, ज्यांनी पाणी आणि स्वच्छतेत भरीव काम केले अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवामुक्तीचा बहुमान मिळाल्याने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद