शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

ॲप नव्हे तलाठ्यानेच करावी पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही मोहीम मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन स्वतःच्या शेतातील ...

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही मोहीम मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन स्वतःच्या शेतातील माहिती ई-पीक या ॲपवर अपलोड करावी लागते. या मोहिमेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली; पण अल्प मुदतीमुळे अनेक शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी डोकेदुखी ठरत आहे. ही मोहीम थांबवून तलाठ्याद्वारेच नोंदणीची मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ विदर्भ उपाध्यक्ष आशिष कापगते यांनी केली आहे.

या मोहिमेमध्ये अनेक त्रुटी असून, शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना या ॲप्लिकेशनविषयी शासकीय स्तरावरून कुठलेही मार्गदर्शन मिळाले नाही. ग्रामीण भागात मुख्यत्वेकरून इंटरनेट कव्हरेज समस्या कायम आहे. कित्येक ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची असते व प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाइल शक्य नाही. शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याने ते या मोहिमेपासून वंचित आहेत. या समस्यांमुळे अनेक शेतकरी धान विक्री प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. शेतकऱ्यांना या प्रक्रियेमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही मोहीम बंद करून शासकीय यंत्रणेद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी कापगते यांनी केली आहे.