शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

ॲप नव्हे तलाठ्यानेच करावी पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही मोहीम मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन स्वतःच्या शेतातील ...

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही मोहीम मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन स्वतःच्या शेतातील माहिती ई-पीक या ॲपवर अपलोड करावी लागते. या मोहिमेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली; पण अल्प मुदतीमुळे अनेक शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी डोकेदुखी ठरत आहे. ही मोहीम थांबवून तलाठ्याद्वारेच नोंदणीची मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ विदर्भ उपाध्यक्ष आशिष कापगते यांनी केली आहे.

या मोहिमेमध्ये अनेक त्रुटी असून, शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना या ॲप्लिकेशनविषयी शासकीय स्तरावरून कुठलेही मार्गदर्शन मिळाले नाही. ग्रामीण भागात मुख्यत्वेकरून इंटरनेट कव्हरेज समस्या कायम आहे. कित्येक ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची असते व प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाइल शक्य नाही. शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याने ते या मोहिमेपासून वंचित आहेत. या समस्यांमुळे अनेक शेतकरी धान विक्री प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. शेतकऱ्यांना या प्रक्रियेमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही मोहीम बंद करून शासकीय यंत्रणेद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी कापगते यांनी केली आहे.