शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पावसाळ्यात जिभेच्या चवीला आवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असून हे बघता राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. यामध्ये आता हॉटेल्स ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असून हे बघता राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. यामध्ये आता हॉटेल्स व लहान-मोठ्या टपऱ्या व चायनिजवाल्यांनाही दिलासा मिळाला आहे. यामुळे मात्र आतापर्यंत घरात कोंडून असलेले नागरिक मोकाटपणे घराबाहेर पडत असून सोबतच बाहेरच्या खाण्यावर ताव मारताना दिसत आहे. आतापर्यंत घरात राहून बाहेरचे पदार्थ खाता आले नसल्याने ते आता आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चाट व चायनिज ठेल्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. मात्र पावसाळ्याचा काळ आजारांचा काळ असून त्यात मागील वर्षापासून कोरोना विषाणूची भर पडली आहे. कोरोनाचा विषाणू संसर्गजन्य असल्याने पुढील व्यक्तीपासून पसरत आहे. तरी देखील नागरिक बाहेरचे खाण्यासाठी गर्दी करीत आहेत. शिवाय बाहेरच्या पदार्थात वापरण्यात येणारे तेल, मसाले, पाणी व तेथील स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे घटक असून यात जराही कमी-जास्त झाल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. यामुळेच पावसाळ्यात बाहेरचे खाणे टाळणेच महत्त्वाचे असून घरातील साधे जेवण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

-------------------------------

रस्त्यावरचे खाणे नकोच

रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या टपऱ्यांमध्ये खाद्य पदार्थ स्वस्त मिळत असल्याने कित्येकदा पैसे वाचविण्याच्या नादात नागरिक रस्त्यावरचे पदार्थ खातात. मात्र त्या पदार्थांना बनविताना पाहिजे तशी स्वच्छता बाळगली जात नाही. शिवाय तेल, मसाले, भाज्या व पाण्याची गुणवत्ता नसल्यास ते खाद्य पदार्थ आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरतात. अशातूनच फूड पॉईजनिंग होते व यामुळेच कधी-कधी जीवही जातो. ग्रामीण भागात असले प्रकार घडताना दिसतात. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे खाणे नकोच.

--------------------------------

पावसाळ्यात हे खायला हवे...

- मेथीच्या दाण्यात एंटीमायक्रोबायल तत्त्व असल्यामुळे इंफेक्शनपासून आपला बचाव होते त्यामुळे मेथीच्या दाण्याचे पाणी प्यावे.

- पावसाळ्यात कारल्याचा ज्यूस तसेच तुळस, हळद, लवंग, वेलची, काळीमिरी, दालचिनी यापासून घरात तयार केलेला काढा प्यावा.

- हंगामानुसार येणारे फळ जसे जांभूळ, आवळा, लिची यांचे सेवन करावे.

- हंगामानुसार येणाऱ्या भाज्या जसे परवल, दोडके, दुधी आदींचा आपल्या आहारात समावेश करावा.

- जेवणात डाळींचा वापर करावा तसेच बदाम खावे व नियमित गरम पाणी प्यावे.

------------------------

पावसाळ्यात हे खाणे टाळावे...

- पावसाळ्यात इंफेक्शनचा धोका जास्त असल्याने बाहेरचे चिप्स, पेस्ट्री, शिळे जेवण, रस्त्यावरील पदार्थ खाऊ नये.

- कच्च्या भाज्यांमध्ये पावसाळ्यात किटाणू उत्पन्न होत असल्याने त्या खाऊ नये.

- मिठाचे प्रमाण जास्त असणारे खाद्य पदार्थ पावसाळ्यात खाऊ नये.

- दही व पनीर यासारखे पदार्थ जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेऊन खाऊ नये व मांसाहार टाळावा.

- कोम येणाऱ्या पदार्थांत (उसळ) किटाणू उत्पन्नाचा धोका असल्याने ते खाऊ नयेत.

- पावसाळ्यात पोट खराब होणे, डायरीया यासारखे त्रास उद्भवत असल्याने जेवणात जास्त तेलाचा वापर करू नये.

--------------------------------

कोट

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला पुष्कळ प्रमाणात घाम येतो. यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात पाणी व सूप प्यायला हवे. बाहेरच्या खाण्यातून इंफेक्शनचा धोका असून त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशात बाहेरचे खाणे टाळावे व घरातील साधे जेवण घ्यावे.

- डॉ. मौसमी शाह (ब्राम्हणकर)

आहारतज्ज्ञ

-------------------------------------

कोट

पावसाळ्यात बाहेरील पदार्थांमुळे त्यातही रस्त्यावरील पदार्थांमुळे कित्येक प्रकारचे आजार उद्भवतात. अशात रस्त्यावरचे खाणे टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपल्या आहारात कमी तेल व मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश करावा. जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले तसेच उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत.

- डॉ. विनोद मोहबे

जनरल फिजिशियन