शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

एसआरटी लागवड पद्धत कमी खर्चाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:45 IST

वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. पर्यायाने विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो.

ठळक मुद्दे१४ जिल्ह्यांत लागवड : २ हजार ५०० शेतकºयांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. पर्यायाने विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो. शेतकºयांवर अशी वेळ येवू नये याकरिता शेतकºयांनी अतिशय कमी खर्चाची आणि २० वर्षात एकदाच मशागत करुन लागवड केलेली एसआरटी पद्धत उपयोगात आणली तर शेतकºयांचा मशागतीवरचा खर्च, लागवड खर्च, रासायनिक खताचा खर्च, औषधीचा खर्च, वेळ, श्रम, पैसा आणि पाण्याची बचत होईल अशी माहिती कृषीभूषण चंद्रशेखर गडसावळे यांनी दिली.सडक-अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पत्रकारांसोबत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी आपल्या शेतीवर प्रत्यक्ष प्रयोग करुन झिरो बजेट असणारी शेती करुन नंतर त्याचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टÑात १४ जिल्ह्यात २ हजार ५०० शेतकरी झिरो बजेट शेती करीत आहेत. वाल, चना, लाखोरी, चवळी, धान, मका, ज्वारी, सोयाबिन, कोबी, कापूस अशासारखी पिके घेतली जातात. जर लागवड खर्चच कमी असेल तर शेतकरी कर्जबाजारी होवू शकत नाही असेही गटसावळे यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगीतले. एसआरटी पद्धत नेमकी काय आहे यावर बोलताना ते म्हणाले जमिनीवर होणारे नागरिकांचे अत्याचार न होता जमिनीची धूप थांबविणे, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देणे, त्यामुळे जमिनीत सेंद्रीय कर्ज साठविले त्यामुळे उत्पादनात निश्चित वाढ होवून शेतकºयांना आनंदी करणारी पीक रचना म्हणजे एसआरटी होय. हे तंत्रज्ञान गोंदिया जिल्ह्यातील शेतकºयांनी उपयोगात आणल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशिवार, संचालक देवचंद तरोणे, दिलीप गभणे, हिरालाल चव्हाण, वसंत गहाणे, डॉ. ऋषीराम वाढई. गंगाधर सोनवने, रतिराम कांबळे, रोशन बडोले, सुखदेव कोरे, मिलन राऊत उपस्थित होते.