शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

मीठ खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत काही किराणा व्यावसायीकांनी अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची विक्री करुन चांदी करुन घेतली. त्यानंतर आता मिठाची टंचाई निर्माण होणार आहे, त्यामुळे मीठ मिळणार नाही अशी अफवा ग्रामीण भागात पसविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून खरोखरच मीठ मिळणार नाही म्हणून मिठाचे पुडे आणि पोती नागरिक खरेदी करुन ठेवीत आहे.

ठळक मुद्देटंचाईची अफवा : ग्रामीण भागात विक्रमी विक्री, अफवांवर विश्वास ठेवू नका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊमुळे मिठाची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा जिल्ह्यातील ग्रामीण फसरविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील नागरिक मिठाची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करीत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसात दुकानांमधून विक्रमी मिठाची विक्री झाली आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत काही किराणा व्यावसायीकांनी अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची विक्री करुन चांदी करुन घेतली. त्यानंतर आता मिठाची टंचाई निर्माण होणार आहे, त्यामुळे मीठ मिळणार नाही अशी अफवा ग्रामीण भागात पसविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून खरोखरच मीठ मिळणार नाही म्हणून मिठाचे पुडे आणि पोती नागरिक खरेदी करुन ठेवीत आहे.देवरी तालुक्यातील ककोडी सारख्या दुर्गम भागात तर १० रुपयांचा मिठाचा पुडा ३० रुपयांना विक्री केला जात आहे. तर १६० रुपयांना मिळणारी ठोकळ मिठाची पोती ३०० रुपयांना विक्री केली जात आहे. हाच प्रकार मंगळवारी सडक अर्जुनी तालुक्यात दिवसभर पाहयला मिळायला. डव्वा, म्हसवानी परिसरातील नागरिकांनी मिठाची खरेदी करण्यासाठी किराणा दुकानांमध्ये गर्दी केली होती.अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा, देवरी तालुक्यात सुध्दा हे चित्र होते. नेहमी एक दोन मिठाचे पुडे खरेदी करणारे ग्राहक चक्क मिठाची चुंगडीच विकत घेवून जात होते. मिठाशिवाय जेवणाला सुध्दा चव येत नसल्याने स्वंयपाकातील महत्त्वपूर्ण घटक असल्याने अनेकांनी टंचाई निर्माण झाली तर काय करायचे या काळजीपोटी अनेकांनी मिठाची अतिरिक्त खरेदी करुन ठेवली होती. त्यामुळे किराणा दुकानादारांकडून सुध्दा मोठ्या प्रमाणात मिठाची मागणी केली जात आहे.दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी याची जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी सर्व तहसीलदारांना यासंदर्भात निर्देश देऊन नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मिठाची टंचाई नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले.मिठाच्या स्टॉकची माहिती घेणारजिल्हा पुरवठा विभागाकडून आत्तापर्यंत जिल्ह्यात किती प्रमाणात मिठाचा साठा आहे. याची माहिती घेतली जात नव्हती. तशी वेळ कधीच आली नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मिठाच्या टंचाईच्या अफवेने प्रशासनाची सुध्दा झोप उडाली आहे. त्यामुळे आता मिठाच्या स्टॉकची माहिती घेतली जात आहे. मिठाची टंचाई निर्माण होण्याची कुठलीच शक्यता नसली तरी लोक अफवेला बळी पडून मोठ्या प्रमाणात मिठाची खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मिठाचा भरपूर साठा असून मिठाची टंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. काही अज्ञात लोकांनी मिठाच्या टंचाईची अफवा फसरविल्याने ग्रामीण भागातील लोकांची दिशाभूल होत आहे. मात्र खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच नागरिकांनी अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मिठाची टंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच नाही.- डी.एस.वानखेडेजिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या