शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
4
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
5
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
6
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
7
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
8
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
9
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
10
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
11
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
13
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
14
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
15
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
16
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
18
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
19
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
20
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात

देशप्रेम, देशाप्रती निष्ठा व देशासाठी बलिदानाचा कॉँग्रेसचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:28 IST

महात्मा गांधी व पंडीत नेहरू आदि कॉँग्रेस नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक वर्षे इंग्रजांच्या तुरूंगात काढले. इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. मात्र पूर्वी जनसंघ व आजच्य भारतीय जनता पक्ष आरएसएसमधील एकाही नेत्याचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : कॉँग्रेस कार्यक र्ता प्रशिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी व पंडीत नेहरू आदि कॉँग्रेस नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक वर्षे इंग्रजांच्या तुरूंगात काढले. इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. मात्र पूर्वी जनसंघ व आजच्य भारतीय जनता पक्ष आरएसएसमधील एकाही नेत्याचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. सन १९८५ मध्ये कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आत २०१९ पर्यंतच्या १३४ वर्षांत कॉँग्रेस पक्षाचा देश प्रेम, देशाप्रती निष्ठा व देशासाठी बलिदान देण्याचा स्वर्णिम इतिहास असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी (दि.१६) आयोजीत कॉँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय महिला कॉँगे्रस उपाध्यक्ष आकांक्षा ओला, लेखा नायर, नैसद्ध परमार, प्रदेश महासचिव व प्रशिक्षण प्रमुख अ‍ॅड.रामहरी रूपनवर, डॉ. बबनराव तायवाडे, प्रदेश सचिव जिया पटेल प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिराचा शुभारंभ भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे रोहण करून तसेच पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, भाजपने फक्त देशावासीयांची दिशाभूल करून सत्ता काबिज करण्याचे काम केले. एक जवानाच्या डोक्याच्या बदल्यात १० पाकिस्तान्यांचे मुंडके कलम करण्याची गोष्ट करणाऱ्या प्रधानमंत्र्यांच्या नजरेसमोर पुलवामा येथे जवानांना ठार करण्यात आले. तर दुसरीकडे प्रधानमंत्री निवडणूक रॅलीत व्यस्त होते. त्यांनी दोन कोटी युवांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मात्र आज प्रत्येकच घरात एक बेरोजगार आपल्या भविष्याची चिंता करीत बसला असून याचा जाब आता प्रत्येकच भाजपाईला विचारण्याची गरज आहे. शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात सरकार धानाला २५०० हजार रूपये भाव देत असून शेतकºयांची कर्जमाफी केली आहे. येथे मात्र भाजप १७५० भाव देत आहे. त्याता आता प्रधानमंत्री शेतकºयांना ६ हजार रूपये तीन किश्तमध्ये वार्षीक देवून पुन्हा फुस लावत असल्याचे सांगीतले.शिबिरात भारतीय कॉँग्रेस कमिटी सचिव आशिष दुआ, प्रदेश प्रवक्ता अतु लोंढे, जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, रामरतन राऊत, सहसराम कोरोटे, भरत बहेकार, डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, डॉ.झामसिंग बघेले, पी.जी.कटरे, पृथ्वीपालसिंह गुलाटी, उषा सहारे, उषा मेंढे, राधेलाल पटले, रमेश अंबुले, लता दोनोडे, माधुरी हरिणखेडे, शकील मंसूरी, राकेश ठाकुर, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, बंसीधर अग्रवाल, अनिल गौतम, पन्नालाल सहारे, आलोक मोहंती यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्त्यांसोबत साधला संवादशिबिराच्या पहिल्या सत्रात प्रशिक्षण समितीतील अभिजीत परमार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. तर दुसºया सत्रात अखिल भारतीय महिला कॉँग्रेस सचिव आकांक्षा ओला, लेखा नायर, प्रशिक्षण प्रमुख अ‍ॅड. रामहरी रूपनवर, डॉ. बबनराव तायवाडे यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस