तीन दिवस धान खरेदी बंद

By Admin | Updated: December 7, 2014 22:53 IST2014-12-07T22:53:21+5:302014-12-07T22:53:21+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीच्या अरेरावीविरुद्ध व्यापाऱ्यांनी रणशिंग फुंकले असून पोलिसांत केलेल्या खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद पाळण्याचा निर्णय घेतला.

Closing the purchase for three days | तीन दिवस धान खरेदी बंद

तीन दिवस धान खरेदी बंद

व्यापाऱ्यांचा निर्णय : १० डिसेंबरला व्यापारी संघटनेतर्फे साखळी उपोषण
अर्जुनी/मोरगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीच्या अरेरावीविरुद्ध व्यापाऱ्यांनी रणशिंग फुंकले असून पोलिसांत केलेल्या खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद पाळण्याचा निर्णय घेतला. तर १० डिसेंबर रोजी तालुका व्यापारी संघटनेतर्फे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
४ डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी व धान व्यापारी संघटनेत जुंपली होती. यावर सभापतींनी ५ डिसेंबर रोजी तीन धान व्यापाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुरुवारी कृ.उ.बा.स. च्या संचालक मंडळाची सभा होती. काही व्यापारी आपल्या समस्या घेऊन तेथे पोहोचल असता सभा आटोपली असे त्यांना सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी व संचालक सत्यनारायण चांडक यांच्या परवानगीने व्यापारी सभागृहात पोहोचले. व्यापाऱ्यांनी सभापतींना समस्या सांगितल्या. त्या त्यांनी ऐकून घेतल्या नाहीत. यावर्षी धानाचे एक हजार ५०० रुपये प्रति क्विंटल सेस फी वसूल करण्यात येईल व तांदळाचे भाव दोन हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे संचालक मंडळ व कोणालाही विश्वासात न घेता स्वमर्जीने सभापतींनी ठरविले. यासंदर्भात त्यांना विचारणा केली तर ते उद्धट शब्दात बोलतात व स्वत:च सभागृहांच्या बाहेर जाण्यास बाध्य करतात. उलट पोलीस ठाण्यात त्यांनी व्यापाऱ्यांविरूध्द खोटी तक्रार केली.
बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांना कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण झालेले नाही. ते नसतांनाही व्यापाऱ्यांकडून अवैधरित्या बाजार फी वसूल केली जाते. वडसा, लाखनी, लाखांदूर, ब्रम्हपुरी या ठिकाणच्या बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने शेतमालावर ७० टक्के कर्ज दिले जाते. हा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळत नाही व ते व्यापाऱ्यांना गोदाम भाड्याने दिले जाते. आधारभूत धानाचे शासकीय दर केंद्रशासन ठरवितो. एक हजार ३६० रुपये प्रति क्विंटल दर ठरविले असतांनाही संचालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता एक हजार ५०० रुपये प्रति क्विंटल व्यापाऱ्यांकडून बाजार फी वसूल करण्याचा निर्णय सभापती कुरैशी व सचिव काळबांधे यांनी घेतला असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
या सर्व अन्यायाविरूध्द व्यापाऱ्यांनी ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद ठेवण्याचा एका सभेत निर्णय घेतला आहे. सभापतींच्या कृतीचा राईस मिलर्स, व्यापारी अडते, हमाल संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Closing the purchase for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.