नवीन रेशन कार्डांची नागरिकांची मागणी
By Admin | Updated: June 1, 2016 02:21 IST2016-06-01T02:21:49+5:302016-06-01T02:21:49+5:30
ग्रामीण भागात बऱ्याच वर्षांपासून तेच रेशन कार्ड असून ते पूर्णपणे फाटलेले आहेत. त्यामुळे त्यांची झेरॉक्स काढताना अडचण निर्माण होत आहे.

नवीन रेशन कार्डांची नागरिकांची मागणी
केशोरी : ग्रामीण भागात बऱ्याच वर्षांपासून तेच रेशन कार्ड असून ते पूर्णपणे फाटलेले आहेत. त्यामुळे त्यांची झेरॉक्स काढताना अडचण निर्माण होत आहे. तसेच ज्यांचे कुटुंब वेगवेगळे झाले त्यांना रेशन कार्ड मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वर्षांपासून नवीन रेशन कार्ड तयार करून वितरित करण्यात आले नाही. रेशन कार्ड नसलेल्या विभक्त झालेल्या कुटुंबांना रेशन कार्डवरील गहू, तांदूळ मिळत नाही. तसेच काही लोकांकडील रेशन कार्ड पूर्णपणे जीर्ण होवून गेले आहेत. त्यांच्या छायांकित प्रती काढणेही कठिण झाले आहे.
रेशन कार्ड नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. रेशन कार्ड हे रहिवासी असल्याचा मुख्य पुरावा समजला जातो. अनेक महत्वाच्या ठिकाणी रेशन कार्डअभावी सवलतीची कामे रखडली जातात. रेशन कार्डद्वारे शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळविता येते. मात्र ग्रामीण भागात नागरिकांकडील रेशन कार्ड जीर्ण झाल्याने ते नसल्यासारखेच झाले आहेत. त्यामुळे रेशन दुकानदार, रॉकेल विक्रेता धान्य देताना नोंद कुठे करावी, याचा विचार करतो.
या परिसरात अनेक कुटुंबांकडे रेशन कार्ड नाहीत. त्यांना शासनाच्या सोयी-सुविधांचा लाभ घेता यावे, यासाठी नवीन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)