शिक्षकांसाठी ‘कॅशलेस’ आरोग्य योजना

By Admin | Updated: December 9, 2014 22:52 IST2014-12-09T22:52:47+5:302014-12-09T22:52:47+5:30

आॅपरेशन्स आणि दुर्धर आजार यांच्या मेडिकल बिलांचा परतावा मिळण्यासाठी होणाऱ्या प्रचंड मनस्तापातून शिक्षकांची आता सुटका होणार आहे. शिक्षक भारतीच्या वतीने मागच्या सरकारला दिलेल्या

'Cashless' health plan for teachers | शिक्षकांसाठी ‘कॅशलेस’ आरोग्य योजना

शिक्षकांसाठी ‘कॅशलेस’ आरोग्य योजना

गोंदिया : आॅपरेशन्स आणि दुर्धर आजार यांच्या मेडिकल बिलांचा परतावा मिळण्यासाठी होणाऱ्या प्रचंड मनस्तापातून शिक्षकांची आता सुटका होणार आहे. शिक्षक भारतीच्या वतीने मागच्या सरकारला दिलेल्या सावित्री-फातिमा कॅशलेस शिक्षक कुटूंब आरोग्य योजनेला नवीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही हिरवा कंदिल दिला आहे.
आ.कपिल पाटील यांच्यासमवेत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, प्रमुख कार्यवाह सुभाष मोरे आणि कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी शिक्षणमंत्र्यांची पुन्हा त्या प्रश्नावर भेट घेतली. तेव्हा त्यांनी या प्रस्तावाचे आणि योजनेचे कौतुक केले आणि ही योजना ताबडतोब मार्गी लावत आहोत, असे सांगितले.
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारतर्फे कॅशलेस कुटूंब आरोग्य सुविधा पुरविली जाते.
मुंबई आणि राज्यातीलच नव्हे तर देशातील नामांकित दवाखान्यांमध्ये विना कॅश महागडे उपचार करुन घेणे त्यामुळे पोलिसांना शक्य झाले आहे. त्याच धर्तीवर शिक्षक भारतीने हा प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे सादर केला आहे. सदर योजनेमुळे शासनाच्या खर्चातही बचत होणार असून शिक्षक आणि त्यांच्या कुटूंबीयांना वेळेत चांगल्या दवाखान्यात उपचार करून घेणे शक्य होणार आहे.
शिक्षकांची ही आगळीवेगळी योजना शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, सुभाष मोरे आणि जालिंदर सरोदे यांनी तयार केली होती. या योजनेला शिक्षणमंत्र्यांची मान्यता मिळाल्यामुळे आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागाकडे जाणार आहे. याच धर्तीवर पेन्शनधारकांसाठी सुध्दा विशेष योजना राबवणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती शिक्षक भारती गोंदियाचे अध्यक्ष महेंद्र सोनवाने यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'Cashless' health plan for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.