शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

जलसंपदा व महसूल विभागांनी योग्य समन्वय साधून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. पूर परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी त्वरीत प्रतिसाद देणे, संबंधीत माहिती विचारु न दक्षता घेऊन शोध व बचावकार्य करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे , गावपातळीवर गठित होणार आपत्ती व्यवस्थापन समिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील धरण, जलाशये, तलाव व नद्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत अचानक पाऊस पडल्यास जिल्ह्यातील ८७ गावांना पुराचा धोका नाकारता येत नाही. येणाऱ्या पुराच्या आपत्तीची तिव्रता कमी करण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी (दि.११) आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा सभेत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहा.जिल्हाधिकारी रोहन घुगे, सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. बलकवडे यांनी, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्याचे सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे.जलसंपदा व महसूल विभागांनी योग्य समन्वय साधून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. पूर परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी त्वरीत प्रतिसाद देणे, संबंधीत माहिती विचारु न दक्षता घेऊन शोध व बचावकार्य करण्याचे निर्देश दिले.तसेच पूर परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हेलीपॅड बांधण्या संबंधात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तसेच संबंधित तहसीलदारांनी समन्वय ठेवून काम करावे. जिल्ह्यातील पर्यंटनस्थळे, धरण, जलाशये, तलाव तसेच धोक्याच्या ठिकाणी कुणीही सेल्फी घेताना किंवा गर्दी करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कार्यवाही करावी. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी जिल्हयातील तालुका, नगर परिषद, नगर पंचायत, प्रभाग, वॉर्ड आणि ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करावी. जेणेकरु न पूर परिस्थीतीत ग्राम पातळीपर्यंत समन्वय साधला जाऊ शकेल तसेच पूर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल असे सांगीतले.तसेच सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करण्याचे व पूर प्रवण ८७ गावांचा सुक्ष्म आराखडा तयार करुन मान्सून कालावधीत सुरक्षित स्थळ (निवारा) चिन्हांकित करुन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी या वेळी संबंधित विभागाकडून तयारीचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या. सभेला उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, गंगाधर तळपदे, शिल्पा सोनाले, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसीलदार राजेश भांडारकर, विनोद मेश्राम, सी.जी.पित्तुलवार, प्रशांत घोरुडे, डी.एस.भोयर, विजय बोरूडे, अपर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसलीदार राजेश वाकचौरे, आर.एम खोकले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे तसेच सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.बॅरिकेट्स, औषध व फलक व्यवस्थाजलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंऱ्यांना धरणाचे पाणी सोडण्यापुर्वी सर्व संबंधितांना सूचना देण्याबाबत, पोलिस विभागाला पाण्याखाली बुडालेले रस्ते व पूल या ठिकाणी बॅरिकेटींग लावून बंदोबस्त करण्याबाबत, पुरवठा विभागाला पूर प्रवण सर्व ८७ गावांत धान्याचा साठा उपलब्ध करण्याबाबत, विद्युत विभागाला तारांवरील झाडांच्या फांद्या कापणे, कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह यांना धोक्याच्या ठिकाणी रेडियमचे फलक लावण्याबाबत, आरोग्य विभागाला सर्व आरोग्य केंद्रात औषधांचा पर्याप्त साठा व पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची माहिती सर्व ग्रामपंचायतीत लावण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना नाले, नालींची स्वच्छता करुन जीर्ण इमारत मालकास नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी