शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

जलसंपदा व महसूल विभागांनी योग्य समन्वय साधून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. पूर परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी त्वरीत प्रतिसाद देणे, संबंधीत माहिती विचारु न दक्षता घेऊन शोध व बचावकार्य करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे , गावपातळीवर गठित होणार आपत्ती व्यवस्थापन समिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील धरण, जलाशये, तलाव व नद्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत अचानक पाऊस पडल्यास जिल्ह्यातील ८७ गावांना पुराचा धोका नाकारता येत नाही. येणाऱ्या पुराच्या आपत्तीची तिव्रता कमी करण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी (दि.११) आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा सभेत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहा.जिल्हाधिकारी रोहन घुगे, सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. बलकवडे यांनी, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्याचे सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे.जलसंपदा व महसूल विभागांनी योग्य समन्वय साधून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. पूर परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी त्वरीत प्रतिसाद देणे, संबंधीत माहिती विचारु न दक्षता घेऊन शोध व बचावकार्य करण्याचे निर्देश दिले.तसेच पूर परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हेलीपॅड बांधण्या संबंधात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तसेच संबंधित तहसीलदारांनी समन्वय ठेवून काम करावे. जिल्ह्यातील पर्यंटनस्थळे, धरण, जलाशये, तलाव तसेच धोक्याच्या ठिकाणी कुणीही सेल्फी घेताना किंवा गर्दी करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कार्यवाही करावी. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी जिल्हयातील तालुका, नगर परिषद, नगर पंचायत, प्रभाग, वॉर्ड आणि ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करावी. जेणेकरु न पूर परिस्थीतीत ग्राम पातळीपर्यंत समन्वय साधला जाऊ शकेल तसेच पूर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल असे सांगीतले.तसेच सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करण्याचे व पूर प्रवण ८७ गावांचा सुक्ष्म आराखडा तयार करुन मान्सून कालावधीत सुरक्षित स्थळ (निवारा) चिन्हांकित करुन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी या वेळी संबंधित विभागाकडून तयारीचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या. सभेला उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, गंगाधर तळपदे, शिल्पा सोनाले, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसीलदार राजेश भांडारकर, विनोद मेश्राम, सी.जी.पित्तुलवार, प्रशांत घोरुडे, डी.एस.भोयर, विजय बोरूडे, अपर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसलीदार राजेश वाकचौरे, आर.एम खोकले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे तसेच सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.बॅरिकेट्स, औषध व फलक व्यवस्थाजलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंऱ्यांना धरणाचे पाणी सोडण्यापुर्वी सर्व संबंधितांना सूचना देण्याबाबत, पोलिस विभागाला पाण्याखाली बुडालेले रस्ते व पूल या ठिकाणी बॅरिकेटींग लावून बंदोबस्त करण्याबाबत, पुरवठा विभागाला पूर प्रवण सर्व ८७ गावांत धान्याचा साठा उपलब्ध करण्याबाबत, विद्युत विभागाला तारांवरील झाडांच्या फांद्या कापणे, कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह यांना धोक्याच्या ठिकाणी रेडियमचे फलक लावण्याबाबत, आरोग्य विभागाला सर्व आरोग्य केंद्रात औषधांचा पर्याप्त साठा व पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची माहिती सर्व ग्रामपंचायतीत लावण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना नाले, नालींची स्वच्छता करुन जीर्ण इमारत मालकास नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी