शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

बीएसएनएलची बत्ती झाली गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:27 IST

लाखोंच्या घरात पोहचलेली वीज बिलाची थकबाकी बीएसएनएलच्या (भारतीय दूर संचार निगम) चांगलीच अंगलट आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे मात्र बीएसएनएलचा कारभार किती बिकट झाला आहे याची प्रचिती येत आहे.यातील काही एक्सचेंज व टॉवरची पैसे भरल्यानंतर वीज जोडणी करण्यात आली असली तरी आजही मोठ्या संख्येत टॉवरची बत्ती गुलच आहे.

ठळक मुद्देथकबाकी आली अंगलट : एक्सचेंज व टॉवरवर संकट, ग्राहकांना फटका

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लाखोंच्या घरात पोहचलेली वीज बिलाची थकबाकी बीएसएनएलच्या (भारतीय दूर संचार निगम) चांगलीच अंगलट आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे मात्र बीएसएनएलचा कारभार किती बिकट झाला आहे याची प्रचिती येत आहे.यातील काही एक्सचेंज व टॉवरची पैसे भरल्यानंतर वीज जोडणी करण्यात आली असली तरी आजही मोठ्या संख्येत टॉवरची बत्ती गुलच आहे.खाजगी दूरसंचार क्षेत्रात आज चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र शासन अखत्यारित असलेल्या बीएसएनएलकडून अद्यापही चांगल्या सुविधेची अपेक्षा बाळगून मोठ्या प्रमाणात ग्राहक बीएसएनएलने जुळले आहेत. मात्र असे असतानाही ग्राहकांची अपेक्षापूर्ती होत नसून ‘नाम बडे और दर्शन खोटे’ ही स्थिती बीएसएनएलची दिसून येत आहे. हाच प्रकार बीएसएनएलच्या आर्थिक व्यवहारांबाबतही आता बघावयास मिळत आहे.बीएसएनएलवर वीज वितरण कंपनीची लाखो रूपयांची थकबाकी झाल्याची माहिती असून यातूनच महावितरणने बीएसएनएलच्या एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल करण्यास सुरूवात केली आहे. यांतर्गत महावितरणने जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरावर थकबाकी असलेल्या बीएसएनएल एक्सचेंज व टॉवरचा पुरवठा खंडीत करण्यास जानेवारी महिन्यापासून सुरूवात केली आहे.यांतर्गत सद्यस्थितीत आमगाव तालुक्यातील रिसाम व तिगाव हे दोन टॉवर वीज बिलाचा भरणा केल्यामुळे सुरू झाले असून उर्वरीत तालुक्यांतील बहुतांश टॉवरची आजही बत्ती गुल झालेलेली आहे.महावितरणच्या या कारवाईमुळे याचा परिणाम मोबाईल सेवेवरही होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, शहरातील सुभाष बागेच्या बाजूच्या बीएसएनएल कार्यालयाची सुमारे १ लाख रूपयांची थकबाकी असल्याने येथील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तर सालेकसा येथील एक्सचेंजची सुमारे ९४ हजार रूपयांची थकबाकी असल्याने तेथीलही वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असल्याची माहिती आहे.पैसे भरल्याने केली जोडणीवीज वितरण कंपनीने दणका दिल्यानंतर आता बीएसएनएलचे धाबे दणाणले असून वीज बिल थकबाकीचे पैसे भरण्यास सुरूवात केली आहे. यामुळे महावितरणने गोंदिया ग्रामीण मधील मुंडीपार व पांढराबोडी येथील दोन्ही टॉवरची सुमारे ५० हजार रूपयांची थकबाकी भरली. तिरोडा तालुक्यातील तिरोडा येथील एक्सचेंजचे सुमारे ५ लाख रूपये व वडेगाव येथील टॉवरचेही पैसे भरण्यात आले.आमगाव तालुक्यातील रिसामा व तिगाव येथील टॉवरची थकबाकी भरण्यात आल्याने त्यांची वीज जोडणी करण्यात आली आहे.