शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या रहदारीने पुलांना अकाली वृद्धत्व!

By admin | Updated: August 5, 2016 01:28 IST

जिल्ह्यातूून जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गासह ग्रामीण रस्त्यांवर अनेक ठिकाणी पूल आहेत.

ओव्हरलोड वाहनांची वर्दळ : ठेंगण्या रपट्यांची उंची वाढविण्याची गरज गोंदिया : जिल्ह्यातूून जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गासह ग्रामीण रस्त्यांवर अनेक ठिकाणी पूल आहेत. हे सर्व पूल अलिकडच्या ५० ते ६० वर्षातील आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या यापैकी एकही पूल मुदतबाह्यकिंवा धोकादायक स्थितीत आलेला नाही. मात्र गेल्या ५० वर्षात वाढलेला रहदारीचा भार, जड वाहनांची वर्दळ पाहता अनेक पूल मुदतीपूर्वीच जर्जर होण्याच्या स्थितीत आले आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल अचानक तुटून काही वाहने नदीत वाहून गेल्याने राज्यभरातील बांधकाम यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रस्ता आणि रेल्वेमार्गावरील पूल किती सुरक्षित आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. जिल्ह्यात राज्य सरकारच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर १६ मोठे तर २५६ लहान पूल आहेत. मात्र यापैकी एकही पूल मुदतबाह्य किंवा धोकादायक नसल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. असे असले तरी काही जुन्या पुलांच्या डागडुजीची गरज आहे. हे काम अधूनमधून सुरू असते. जड वाहनांची वाढलेली वर्दळ यामुळे त्या पुलांचे आयुष्य कमी होत आहे. अकाली वृद्धत्वाकडे त्या पुलांची वाटचाल सुरू आहे. पुलांना वर्दळीचा फटका देवरी : तालुक्यात ब्रिटीशकालीन पूल एकही नसला तरी नंतर निर्माण झालेल्या पुलांची संख्या डझनभर आहे. या रूंद-अरुंद पुलांवरून दिवसेंदिवस वाहतुकीचा भार वाढतच आहे. या पुलावरून तालुक्यात ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सगळेच पूल जीर्ण होत आहेत. याबाबत शासनाने वेळीच गंभीर होणे गरजेचे झाले आहे. देवरी ते आमगाव मार्ग वर्दळीचा आणि सर्वात महत्वाचा राज्य महामार्ग क्रमांक २७६ आहे. या महामार्गावर दररोज शेकडो ओव्हरलोड छोटी-मोठी वाहने ये-जा करीत असतात व याच मार्गावर देवरीपासून १ किमी अंतरावर भागीजवळ असलेला पूल व डवकी नाल्याचा पूल हे ५० वर्षापूर्वीचे आहेत. सद्यस्थितीत त्यांची परिस्थिती बिकट आहे. हे पूल जास्त उंच नसल्याने पावसाळ्यात अनेक वेळा पुलावरून पाणी जाते व रहदारीसुध्दा दोन-दोन दिवस बंद राहते. ५० वर्षापूर्वीच्या वाहतुकीचा अंदाज घेऊन पूल बांधण्यात आले होते. परंतु आजची स्थिती पाहता दर मिनीटाला ४० ते ५० छोटी-मोठी ओव्हरलोड वाहने त्यावरून जात असतात. हीच अवस्था देवरी-चिचगड-ककोडी मार्गावरील छोट्या नाल्यावरच्या पुलांची आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकाही पुलाचे अजूनपर्यंत आॅडीट करण्यात आले नाही. जीर्ण झालेल्या या पुलांवर केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते. महाडमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर आतातरी प्रशासन जागे होवून तालुक्यातील जीर्ण झालेल्या पुलांकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत. कोलकाता रेल्वेलाईन धोक्यात सालेकसा : सालेकसा तालुक्यातून वाघ नदी वाहते. ही जिल्ह्यातील एक मोठी नदी आहे. या नदीवर अनेक ठिकाणी पूल बांधण्यात आले आहेत. त्याच बरोबर मुंबई-हावडा रेल्वे मार्गही या नदीवरून गेला आहे. वाघ नदीवर धानोली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रेल्वेचा पूल आहे. तो शतकी ओलांडून मुदतबाह्य झाला आहे. त्यामुळे रेल्वेला त्या पुलाच्या पुननिर्मिर्तीबद्दल विचार करणे गरजेचे झाले आहे. रेल्वे मार्गाखालील नदी-नाल्यांवर बांधलेले सर्व पूल मुदतबाह्य झाले आहेत. प्रत्येक पुलाची मुदत १०० वर्षाची होती. आता त्या पुलांनी १२५ ते १५० वर्षे ओलांडली आहेत. रेल्व विभागाने पुलाखाली लोखंडी अँंगल व खांबाचा आधार देत त्याच पुलाचा वापर सुरू ठेवला आहे. ८-१० वर्षापूर्वी दर्रेकसानजीक बोगद्याजवळ रेल्वे पूल कोसळला होता. त्यावेळी तेथून मालगाडी जात होती. पूल कोसळताना मालगाडी थोडक्यात बचावून पुलावरच अधांतरी होती. नंतर तिथे नवीन पूल तयार करण्यात आला. शासनाने इतर पुलांबद्दल वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे. रस्ता मार्गावरील सर्व पुलांची निर्मिती ५० वर्षाच्या आतील असल्यामुळे सध्या त्या पुलांबद्दल असुरक्षितता दिसून येत नाही. तरीसुध्दा बांधकाम विभागाने व परिवहन विभागाने वेळोवेळी महत्वाच्या व सतत रहदारीच्या पुलांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. वाघ नदीवरील सर्वात मोठा पुल सालेकसा-आमगाव बस मार्गावर साकरीटोलानजीक आहे. त्या पुलाची उंची जास्त असल्यामुळे वाघ नदीला कितीही पूर आला तरी पुलावरून पाणी जाण्याची चिंता नसते. या पुलाची निर्मिती जवळपास ४२ वर्षापूर्वी झाली आहे. मात्र तो पूर्णपणे सुरक्षित आहे. (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून)