शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

जि.प.मधील युतीचा ब्रेकअप आठ दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:29 PM

एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, जिल्हा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात जि.प.तील अभद्र युती तोडण्यात येईल अशी ग्वाही काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख माजी खा.नाना पटोले यांनी रविवारी (दि.२१) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, महासचिव अमर वºहाडे, विनोद जैन, के.आर.शेन्डे, डॉ.नामदेव किरसान उपस्थित होते. जि.प.ची पोटनिवडणूक पार पडल्यानंतर गोंदिया जि.प.मध्ये असलेली काँग्रेस-भाजप अभद्र युती तोडण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी पक्ष श्रेष्ठींना सांगितले होते.मात्र पोटनिवडणूक होवून महिनाभराचा कालावधी लोटूनही युती तोडण्यात आली नसल्याचा प्रश्न माजी खा.नाना पटोले यांना केला असता त्यांनी ही अभद्र युती पक्षाला सुध्दा मान्य नाही.येत्या आठ दिवसात जि.प.तील अभद्र युती तोडण्यात येईल असे सांगितले.गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली. सरकारने यावर त्वरीत निर्णय न घेतल्यास भाजपच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात आणि गावात पाय ठेवू देणार नाही, या विरोधात लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले.भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार व कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते.मात्र यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन तीन वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.उलट शेतकरी थकबाकीदार झाल्याने त्यांना राष्टÑीयकृत बँकाकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांना १६ तास वीज देण्याची मागणीही पटोले यांनी केली.निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षावरआगामी विधानसभा निवडणूक आपण लढणार का असा प्रश्न नाना पटोले यांना केला असता सध्या आपल्यावर पक्षाने राज्याच्या प्रचारप्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे.त्यामुळे ती यशस्वीपणे पार पाडणे ही पहिली जबाबदारी आहे.पक्षाने विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यास आपण निर्णय घेवू असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेzpजिल्हा परिषद