विमा कंपनीला दणका

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:57+5:302015-12-05T09:07:57+5:30

फायनान्स केलेले टाटा-२०७ वाहन मालकाच्या घरी तीन अज्ञात इसम येऊन त्यांच्या अनुपस्थितीत घेवून गेले.

Bima Insurance Company | विमा कंपनीला दणका

विमा कंपनीला दणका

ग्राहक न्यायमंचचा निर्णय : ७५ टक्के विमा रक्कम देण्याचे आदेश
गोंदिया: फायनान्स केलेले टाटा-२०७ वाहन मालकाच्या घरी तीन अज्ञात इसम येऊन त्यांच्या अनुपस्थितीत घेवून गेले. याबाबत तक्रारकर्त्या वाहन मालकाने आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केला. मात्र सदर कंपनीने दावा नाकारल्याने तक्रारकर्त्याने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. न्यायमंचाने आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीला चांगलाच दणका देत विम्याची ७५ टक्के रक्कम देण्याचा आदेश पारित केला.
चैत्राम भैयालाल पगाडे रा. श्रीरामटोली (माल्ही) ता. आमगाव असे तक्रारकर्त्या वाहनमालकाचे नाव आहे. त्यांनी १९ जून २०१२ रोजी टाटा-२०७ हे वाहन नांगिया मोटर्स गोंदिया यांच्याकडून खरेदी केले होते. सदर वाहन टाटा मोटर्स फायनांस कंपनी नागपूर यांच्याकडून फायनांस केले होते. पगाडे यांनी १५ हजार व २२ हजार ५८७ रूपये अशी हप्त्याची रक्कम नांगिया मोटर्स यांना दिली होती.
तक्रारकर्ते पगाडे यांनी टाटा मोटर्सचे एजंट राजपाल सरदार रा. गोंदिया यांच्या सांगण्यावरून २१ आॅगस्ट २०१२ रोजी १० हजार रूपये, २५ आॅगस्ट २०१२ रोजी १३ हजार ५०० रूपये व ३१ आॅगस्ट २०१२ रोजी एक हजार ५०० रूपये असे २५ हजार रूपये विरूद्ध पक्ष-२ टाटा मोटर्स यांना दिले होते. यानंतर पगाडे अमृतसर येथे गेले असताना ३ आॅक्टोबर २०१२ रोजी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले आणि वाहन व हप्त्याची मागणी करू लागले. पगाडे यांच्या मुलाने कर्जाचे पैसे घरी नसल्याचे सांगितले. परंतु वाहनाची किल्ली वाहनामध्ये असल्याने ते तिन्ही अनोळखी व्यक्ती सदर वाहन घेऊन गेले.
यानंतर तक्रारकर्ते पगाडे हे ७ आॅक्टोबर २०१२ रोजी नांगिया मोटर्स गोंदिया यांच्या कार्यालयात जप्त केलेल्या वाहनाची चौकशी करण्यासाठी गेले असता टाटा फायनांस कंपनीने सदर वाहन जप्त न केल्याचे सांगितले. पगाडे यांनी वाहनाचे आवश्यक कागदपत्रे टाटा मोटर्स फायनांस कंपनीकडून मिळविले. त्यानंतर त्यांनी २७ आॅक्टोबर २०१३ रोजी सदर वाहन नेणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींविरूद्ध आमगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
पगाडे यांनी सर्व कागदपत्रांसह आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या कार्यालयात वाहन नुकसान भरपाई दावा सादर केला. मात्र विमा कंपनीने सदर दावा नामंजूर केला. पगाडे यांनी नांगिया मोटर्स यांच्याकडे आटीओ क्लिअरंस व आसी बुक याबाबत विचारणा केली. त्याकडे नागिया मोटर्स यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान टाटा मोटर्स कंपनीकडून सतत हप्त्याची रक्कम भरण्याची मागणी होत होती. परंतु ३० आॅक्टोबर २०१२ पासून वाहन तक्रारकर्त्याकडे नव्हतेच. त्यामुळे त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.
विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम नामंजूर केल्यामुळे पगाडे यांनी आपले वकील अ‍ॅड. अखिल श्रीवास्तव यांच्यामार्फत विमा कंपनीला नोटीस पाठविले. त्यात सदर वाहन गहाळ झाल्याबद्दल पाच लाख २१ हजार ४३१ रूपये १५ टक्के व्याजासह नुकसान भरपाईपोटी मिळावे, असा दावा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात दाखल केला. सदर दाव्यामध्ये विरूद्ध पक्ष-१ नांगिया मोटर्स व विरूद्ध पक्ष-२ टाटा मोटर्स फायनान्सकडून कोणीही हजर नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध एकतर्फी निर्णय देण्यात आला. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडून अ‍ॅड. गजभिये यांनी दाव्यामध्ये उत्तर दाखल केले. युक्तिवादात सदर चोरले नसून जप्तीची कारवाई केल्याचे म्हटले. (प्रतिनिधी)

Web Title: Bima Insurance Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.