शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

By Admin | Updated: February 27, 2017 00:14 IST2017-02-27T00:14:45+5:302017-02-27T00:14:45+5:30

तिरोडा शहराचा सर्वांगीण विकास आणि शहरवासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी

Best Support for the Development of the City | शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

राजकुमार बडोले : ४ कोटी ७१ लाखांतून होणार सभागृह
तिरोडा : तिरोडा शहराचा सर्वांगीण विकास आणि शहरवासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
२५ फेब्रुवारी रोजी नगरपरिषद गांधी विद्यालय तिरोडा येथील परिसरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विशेष अनुदानातून ४ कोटी ७१ लक्ष रुपयांच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ.रहांगडाले होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, माजी आमदार भजनदास वैद्य, हरीश मोरे, न.प.उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर, माजी नगराध्यक्ष अजियसंह गौर, मुख्याधिकारी उरकुडे उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, तिरोडा शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. नगरपरिषदेने जो विकास आराखडा तयार केला आहे त्यानुसार कामे होत आहेत का हे महत्वाचे आहे. कामे झाली असतील तर शहर सर्व्हेक्षण करून आराखडा पुन्हा तयार करण्यात येईल. विकास करताना आराखड्यानुसार कामे झाली पाहिजेत. नागरी सुविधांची कामे करण्यात येतील. नगरोत्थान योजनेतून निधी देणार असल्याचे सांगून महात्मा फुले वार्डातील वन जमिनीच्या पट्यांचा प्रश्न दूर करुन सुटला पाहिजे. याबाबत लवकरच बैठक घेवून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. शहरातील पात्र व गरजू लाभार्थ्यांना २०१९ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना व शबरी घरकूल योजना या योजनांमधून घरकुल बांधून देण्यात येतील. तिरोडा नगरपालिका क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यात येईल असेही सांगितले.
यावेळी अतिथींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तिरोडातील नागरिकांची विशेषत: महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

Web Title: Best Support for the Development of the City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.