शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे झुडूपेही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 13:40 IST

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये परिचरच नसल्यामुळे वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. बंद असलेल्या शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर केले आहे.

ठळक मुद्देउंदरांचे झाले आश्रयस्थान, शाळा परिसरात वाढलेल्या गवतावर जनावरांचा वावर

गोंदिया : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी घरी आहेत. कोरोनामुळे शाळेला लागलेल्या कुलूपावर गंज चढली. परंतु शाळा काही उघडण्याचे नाव घेत नाही. खासगी शाळा बंद असल्या तरी त्या शाळांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. परंतु जिल्हा परिषद शाळेत परिचरच नसल्याने बंद असलेल्या शाळांची दैना परिस्थिती झाली असून वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. बंद असलेल्या शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर केले आहे. त्या उंदरांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी सापांनीही शाळेत जागा जागा शोधून घेतली आहे. 

मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून आपल्या वर्ग खोल्या पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये साप आणि विंचवांचा वावर सुरू झाला तर परिसरात कंबरेएवढे गवत वाढून सर्वत्र कचरा जमा झाला. ज्या शाळेला आवारभिंत नाही किंवा आवारभिंत असूनही गेट नाही, अशा शाळेच्या आवारात त्या गावातील जनावरे येऊन चरत असतात. बंद असलेल्या जि. प. शाळांत साप, विंचवांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांना व शाळेच्या आवारात खेळणाऱ्या बालकांना याचा धोका आहे.

वर्गखोल्यांमधील धूळ हटेना -

वर्गातील डेस्क, बेंचवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. शाळाच बंद असल्याने त्या शाळा स्वच्छ करण्याचा मानस कुणी ठेवला नाही. धूळ आणि वर्गात पसरलेले जाळे अशी या शाळांतील वर्गखोल्यांची विदारक परिस्थिती आहे.

जबाबदारी कुणाची?

शाळांत वाढलेला कचरा, साप, विंचवांनी पकडलेली जागा, याला शाळा प्रशासन जबाबदार असले तरी शाळेत असलेले परिचरपद शासनाने कमी केल्याने वर्गखोल्यांमध्ये जमलेली धूळ आता मुख्याध्यापकांनी स्वच्छ करावी का, हा प्रश्न उपस्थित होतो.

शाळेत साठलेला कचरा काढण्यासाठी किंवा बंद असलेल्या शाळा सुसज्ज करण्यासाठी शासनाने निधी दिलेला नाही. या शाळेची स्वच्छता करण्यापासून शाळेचे साहित्य निकामी झाले. त्याची दुरूस्ती करण्याचा भार मुख्याध्यापकांवरच टाकला जातो. मुख्याध्यापक आपल्या जवळून शाळेला सजविण्यासाठी किती पैसे खर्च करणार?

शिक्षकांची उपस्थिती किती?

इयत्ता ८ ते १२ वीच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू आहेत. परंतु वर्ग १ ते ७च्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू नसली तरी शाळा शिक्षकांसाठी सुरू आहेत. आता सर्वच शाळांत शंभर टक्के शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे पत्र शिक्षण विभागाने २७ ऑगस्ट रोजी काढले आहे.

आकडेवारी काय सांगते

तालुका         --      जि.प. प्राथमिक शाळा        --           शिक्षक संख्या

आमगाव       --         ११०                                --          ३९७अर्जुनी-मोरगाव  --    १३२                               --          ४१८

देवरी                 --     १४२                              --          ३७४गोंदिया              --    १८८                               --          ८२५

गोरेगाव             --     १०८                            --           ३७९सडक-अर्जुनी    --     १०९                           --            ३५४

सालेकसा           --     ११२                          --             ३४०तिरोडा               --     १३८                         --             ४७९

शाळेला सुसज्ज करण्याचे काम शिक्षण विभाग करेल -

बहुतांश शाळांच्या इमारती पक्क्या आहेत. सिमेंट काँक्रिटने बेस तयार केला आहे. त्यामुळे उंदीर, साप, विंचू शाळेच्या आवारात शक्यतो येणार नाहीत. काही शाळांमध्ये हा प्रकार दिसून येत असेल तर त्या शाळेला सुसज्ज करण्याचे काम आमचा शिक्षण विभाग करेल. सध्या शाळा बंद आहेत. शाळेत शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती आहे.

- के. वाय. सर्याम, शिक्षणाधिकारी, गोंदिया

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण